शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पेसामुळे बिगर आदिवासींवर होतोय अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 23:13 IST

पांढरीचापाडा येथे कार्यक्रम; कुणबी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

- विश्वनाथ पाटीलकिन्हवली : महाराष्ट्रात विविध समाजांच्या आरक्षणाची चर्चा तसेच उग्र आंदोलने सुरू आहेत. राजकीय पक्ष अनेक समाजांच्या प्रश्नांवर चर्चा करताना दिसतात. मात्र, सरकार कुणबी समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे वक्त व्य पांढरीचापाडा या मठावर झालेल्या कार्यक्र मात कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.डोळखांब-पांढरीपाडा गोरक्षनाथ मठ येथे आयोजित ‘कुणबी आरक्षण आणि बिगर आदिवासी आरक्षण’ या जाहीर कार्यक्र मात ते बोलत होते. सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतील चुकीच्या धोरणामुळे शेतकरी तसेच त्यांची शिक्षित पिढी आत्महत्येच्या दिशेने जात आहे. अशा परिस्थितीत उपजीविकेचे साधन म्हणून कुणबी समाज नोकरीकडे पाहत आहे.पेसा क्षेत्रात कुणबी समाजाला शून्य टक्के, तर ओबीसी आरक्षणात ०.१ टक्क्यांपेक्षाही कमी आरक्षण या समाजाच्या वाट्याला आल्याने कुणबी शेतीतून हद्दपार होत आहेतच. पण, आता शिक्षण तसेच नोकरीतूनही हद्दपार होणार असल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.आदिवासी किंवा मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. खोटी कागदपत्रे सादर करून आदिवासींना शासकीय हलगर्जी तसेच भ्रष्टाचाराने देण्यात आलेल्या एक लाख नोकºया खºया आदिवासींना दिल्या, तर आदिवासींचा नोकºयांचा अनुशेष भरला जाईल. वास्तविक, कुणबी समाजाला घटनात्मक तरतुदींप्रमाणे ओबीसीत आरक्षण मिळणे गरजेचे होते. मात्र, ते मिळाले नाही. कोरडवाहू शेती तसेच शेती करणाºया या समाजाला दºयाखोºयांत राहत असल्याने वर्षानुवर्षे आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. म्हणूनच, हा समाज हलाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शेतकरी नेते केशव भेरे, बिगर आदिवासी संघाचे नेतृत्व करणारे काशिनाथ तिवरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक कैलास पडवळ, ज्येष्ठ नेते हरिभाऊ खाडे, वसंत रसाळ, नंदू डोहळे, हरिभाऊ शिंदे, सुनील वेखंडे, रूपेश कोंगरे यासह सर्वपक्षीय कुणबी नेत्यांसह शेकडो युवक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे