शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

ठाणेकरांच्या समस्या सोडविण्याऐवजी शिवसेना-भाजप गुंतली मतांच्या राजकारणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:44 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे सरकारी कंपन्या, उद्याेगांचे खासगीकरण केले जात आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एकीकडे सरकारी कंपन्या, उद्याेगांचे खासगीकरण केले जात आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. या समस्या सोडविण्याऐवजी शिवसेना आणि भाजप सध्या आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मतांच्या राजकारणात गुंतल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात तर वाहतूककोंडीची समस्या आ वासून उभी आहे. कचराकोंडी खड्डे, पार्किंग, पाणीटंचाई आणि आरोग्याची समस्या असताना त्यावर काही करता येईल का? यावर विचार करण्याऐवजी केवळ मतांंसाठी शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आपली झोळी भरण्याचाच प्रयत्न करीत असल्याची कठोर टीका शिवसेना-भाजपमधील सध्याच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

ठाण्यातील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेनेचा खटाटोप सुरू असताना मंगळवारी शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोंबडी चोर बोलून आंदोलन केले. तर भाजपनेदेखील आम्ही देखील जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला. परंतु, सर्वसामान्य जनतेला हे हवे आहे का? तर याचे उत्तर दोन्ही पक्षांकडे नाही.

कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’

ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून आजही सत्ताधाऱ्यांना किंवा महापालिकेला हक्काचे डम्पिंग ग्राऊंड मिळविता आलेले नाही. किंबहुना आजही शहरातील कचऱ्याची समस्या सोडविता आलेली नाही. शहरात रोज एक हजार मेट्रिक टन कचरा तयार होत असतांना त्याचे व्यवस्थापन आजही शिवसेना किंवा विरोधी पक्ष म्हणून मिरविणाऱ्या भाजपलादेखील करता आलेले नाही.

वाहतूककोंडी पाचवीलाच

ठाण्याची लोकसंख्या वाढत असतांना वाहनांची संख्या वाढत आहे. रस्ते भले मोठे झाले असले तरीदेखील अद्यापही वाहतूककोंडीची समस्या सोडविता आलेली नाही. ती जणू ठाणेकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.