शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 14, 2024 6:05 PM

वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपण गद्य सुद्धा नीट बोलत नाही त्यामुळे पद्य सादरीकरणामध्ये आपल्याला अडचण येते. आपण सादरीकरण कराताना आपल्या उच्चाराकडे लक्ष नसेल तर ऐकणारा श्रोता देखील आपल्या संभाषणाकडे लक्ष देत नाही. वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे तरच श्रोत्यांचे लक्ष जाते असे मत सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.

रविवारी गडकरी रंगायतन येथे टॅग आणि कोमसाप आयोजित काव्य पे चर्चा या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्याशी दिग्दर्शक विजू माने यांनी संवाद साधला. हल्ली काय लिहीले यापेक्षा कोणी लिहीले याला जास्त दाद दिली जाते. नविन लिहिलेल लोकांना ऐकवायला पाहिजे हे सांगताना जोशी यांनी पुढच्या वर्षी वारी ही कविता सादर करुन चर्चेला सुरूवात केली. त्यांनी पहिली कविता कशी सुचली याचा प्रवास उलगडताना जोशी म्हणाले की, छोट्या छोट्या गावांतून ज्यावेळी मुले शहरात येतात त्यावेळी मराठी भाषेचेच वर्गीकरण केले जाते त्यामुळे त्यांना संभाषणाची आणि अभिव्यक्तीची भिती वाटू लागते. त्यामुळे ही मुले कोमेजून जातात. असाच सामाजिक परिस्थीतीमुळे दबले गेल्यामुळे मी सेंटर स्पेस घेण्याचा प्रयत्न करत होतो. कविता सुचते कशी? या माने यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जोशी म्हणाले की, कविता सुचते कशी याला खरंतर उत्तर नसते. कविता स्वयंभू येते. शून्यातून उगवणारी गोष्ट असते. जादूगार आणि कवीत एकच फरक असतो. जादूगाराला जादू करताना त्यातून काय बाहेर येणार आहे हे माहित असते पण कवीला कोणती कविता सुचेल हे माहीत नसते. जादूगाराची जादू बाहेर येते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव असतात पण जेव्हा कवीकडून कविता तयार होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समोर बसलेल्या प्रेक्षकांसारखेच भाव असतात. या जगात अखंड काव्य आहे, लिहीणारा वर बसलेला परमेश्वर आहे. त्याला लिहायचे होते म्हणून तो वेगवेगळ्या देहातून लिहीतोय असे उद्गार त्यांनी काढले.

टॅग्स :thaneठाणे