शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

मोखाड्यात आजारी महिलेला डोलीतून नेण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 8:02 AM

पायवाट तुडवत गाठले आरोग्य केंद्र; ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार

रवींद्र साळवे मोखाडा : दिवसागणिक रस्तेविकासाचे जाळे विस्तारत ‘समृद्धी’सह विविध महामार्ग प्रगतिपथावर नेणाऱ्या, आधुनिकतेकडे वाटचाल करीत मोनो-मेट्रो, बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही आदिवासींना रस्त्याअभावी डोंगरमाथ्याची बिकट वाट तुडवावी लागत आहे, ही शोकांतिका आहे. त्यातूनच रस्त्याअभावी मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील अंगणवाडी सेविका सुंदर किरकिरे (वय ३५) यांना उपचारासाठी डोलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. ग्रामस्थांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. मात्र, अशीच वेळ भविष्यात कुणावर आली तर काय? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. 

पालघरमधील मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील अंगणवाडी सेविका सुंदर किरकिरे (वय ३५) यांना मंगळवारी उलट्यांचा त्रास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारीही त्यांना त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात नेण्यासाठी एकच धावपळ उडाली. मात्र, रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील काही ग्रामस्थांनी बुधवारी (दि. ६) प्लास्टिकसह कापडाची डोली करून चार किलोमीटरची डोंगरवाट तुडवत मोठ्या जिकिरीने त्यांना बेलपाडा येथील मुख्य रस्त्यापर्यंत आणले. पुढे ग्रामीण फर्स्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनचे गंगाराम फसाळे यांनी संस्थेच्या वतीने स्वखर्चातून त्यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोविंद वाघ, जयराम किरकिरे, हनुमंत वाघ, विलास वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे किरकिरे यांना वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे. रस्ता नसल्याने  ग्रामस्थांचे खूपच हाल होत आहेत. सरकारने तातडीने रस्ता बनवावा अशी मागणी परिसरातून सतत केली जात आहे.

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया कोसो दूरच !डिजिटल भारताचे स्वप्न आपण सारेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहे; परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र ‘विकास’ या संकल्पनेत अद्याप आलेला दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षाच आहे.

देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किलोमीटरवर, तर मोखाडा तालुक्यापासून ३० ते ३५ किलोमीटरवर दरी-डोंगरांत वसलेल्या बोटोशी ग्रामपंचायतीतील ४६ घरे असलेल्या २२६ लोकवस्तीच्या मरकटवाट येथील आदिवासींना सोयीसुविधांविना, रस्त्यांअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मरकटवाडीला जायला रस्ता नसल्याने चार किलोमीटरची डोंगरमाथ्याची पायवाट तुडवत ये-जा करावी लागत आहे; त्यामुळेच केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या योजना त्यांच्यापासून कोसो दूर आहेत.