शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

जन आंदोलनांची संघर्ष समितीचे २७ मेपासून ४०० तहसील कार्यालयांसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:45 AM

ठाणे : जनता साथीच्या संकटात सर्व प्रकारे भरडली जात असताना कॉर्पोरेट्सना जबरदस्त अच्छे दिन देऊ केले आहेत, याचा आम्ही ...

ठाणे : जनता साथीच्या संकटात सर्व प्रकारे भरडली जात असताना कॉर्पोरेट्सना जबरदस्त अच्छे दिन देऊ केले आहेत, याचा आम्ही २६ मे च्या बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा दिवसभर निषेध करणार आहोत. तसेच २७ ते ३० मे या काळात राज्यातील ३६ जिल्हाधिकारी व ४०० तहसील कार्यालये येथे सरकारच्या जनविरोधी कारभाराविरुद्ध निदर्शने करून निवेदन देण्यात येईल. यात केंद्र सरकारचा निषेध म्हणून घरांवर व जागोजागी काळे झेंडेही लावण्यात येणार असून, कोविडचे नियम पाळून हे आंदोलन केले जाणार असल्याचे जन आंदोलनांची संघर्ष समितीने सांगितले.

यात २६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा (जयंती) आहे. त्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचे सम्यक विचार मांडणारे धनाजी गुरव व कॉ. भीमराव बनसोड यांचे व्याख्यान समितीतर्फे आयोजित केले आहे.

जन आंदोलनांची संघर्ष समितीसह दिल्ली येथे संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी २६ मे हा दिवस मोदी सरकार निषेध दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले आहे.

- या आहेत मागण्या

केंद्र सरकारने, शेतकरी विरोधी तीन जुलमी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांशी त्वरित चर्चा सुरू करा, कामगारांनी लढून मिळवलेल्या हक्कांना तिलांजली देणारे ४ लेबर कोड रद्द करा, कोरोनाच्या साथीवर सर्व देशवासीयांना मोफत लस आणि उपचार द्या, हाफकीन इन्स्टिट्यूटसारख्या देशातील सार्वजनिक संस्थांना लस उत्पादन करण्यास त्वरित कार्यान्वित करावे, सर्व गरजू जनतेला कार्ड असो वा नसो सर्वांना किमान ४ महिने (एप्रिल ते जुलै) रेशन देण्यात यावे, यांसारख्या इतर प्रमुख मागण्या करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.