शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जीव गेला तरी ‘सीएए’ लागू होऊ देणार नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 02:04 IST

आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार आव्हाड यांनी केला.

मुंब्रा : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाचे तुकडे होण्याची शक्यता आहे. परंतु जीव गेला तरी बेहत्तर हा कायदा महाराष्ट्रात मी लागू होऊ देणार नाही, अशी ठोस ग्वाही गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्रा-कौसा परिसरात आयोजित नागरी सत्कार समारंभात दिली. आव्हाड म्हणाले की, स्वातंत्र्यांसाठी गांधीजींनी अहिंसेचा अवलंब केला. या कायद्याविरोधात लढतानाही अहिंसेचा अवलंब करा. आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने मुंब्र्यातील शंकर मंदिर परीसरात पहिला एसआरए प्रकल्प राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंब्र्यातील मतदारांसाठी कातडीचे जोडे केले तरी कमी पडतील, परंतु आता राज्यातील नागरीकांसाठीही काम करायचे आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी आपल्याला बेडीत न अडकवता ती सैल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव सय्यद अली अशरफ, पक्षाचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शिमम खान, नगरसेवक अशरफ पठाण, बाबाजी पाटील, नगरसेविका अनिता किणे, आशरीन राऊत आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक