शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:28 IST

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मला नरेंद्र मोदी यांचे दोन शब्द सर्वाधिक खटकले. ते म्हणाले की शरद पवार हताश आणि निराश झाले आहेत. ८४ वर्षांचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही. आजही ज्या उत्साहाने ते अग्रेसर भूमिका घेऊन पुढे जात आहेत आणि  त्यांनी जे काही दौरे केले आहेत, त्यामध्ये शरद पवार हताश आहेत असं म्हणणे म्हणजे तुम्ही शरद पवार यांना ओळखलंच नाही," असं आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएसोबत येण्याचीही ऑफर दिली. मोदींच्या या ऑफरवर पलटवार करताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "शरद पवार यांचे त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे. काँग्रेस ही एक गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे. ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं, त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते. त्यांना अजितदादांची काय गरज? ते थेट तुमच्याकडे आले असते," अशा शब्दांत आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

"नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षा-पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं आहे. तुम्ही तुमच्या जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात हे संपूर्ण भारताने पाहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात ज्येष्ठ नेता असा उल्लेख शरद पवारांचा केला आहे. या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो पक्ष यांनी चोरून आणि पळवून नेलेला आहे," असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

रवींद्र वायकरांच्या वक्तव्याचाही समाचार

माझ्याकडे तुरुंगात जाणे किंवा पक्षांतर करणे, असे दोनच पर्याय होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार रवींद्र वायकर यांनी केला आहे. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, "रवींद्र वायकर यांनी केलेलं वक्तव्य अतिशय बोलकं आणि सर्वांना सावध करणारं आहे. मी रवींद्र वायकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगितली, जी इतर कोणी सांगितली नाही. सगळेजण पक्ष सोडून गेले ते याच कारणासाठी, पण रवींद्र वायकर यांनी सत्य सांगून टाकलं ," असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४