शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जितेंद्र आव्हाड दुतोंडी साप; नरेश म्हस्के याची टीका

By अजित मांडके | Updated: January 4, 2024 16:00 IST

आव्हाडांना सांभाळून घ्या ते आपल्यात येणार आहेत. असे उध्दव ठाकरे सांगायचे म्हस्केंचे खळबळजनक विधान.

अजित मांडके, ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची जहरी टीका करताना उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष केले आहे. तसेच आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असे सांगितले जायचं असेही खळबळजनक उद्गार म्हस्के यांनी केले आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री आणि संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व असा टोला म्हस्के यांनी ठाण्यातील आनंदआश्रमामधून प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे. याशिवाय लोकांची माथी भडकवण्याच काम करून दंगली भडकवण्याचा आव्हाडांचा कट असल्याने याबाबत सरकारने चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

पुढे बोलताना म्हस्के यांनी, आव्हाड रात्रीचे ट्विट करतात, आणि सकाळी ते डिलीट करतात.  रात्री त्यांची अवस्था काय असते, हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा असे म्हटले. तसेकंग नेहमीप्रमाणे त्यांनी आता खंत व्यक्त केली आहे, कदाचित ते त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत त्या अवस्थेतून निघाले नसतील असे म्हस्के यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो, तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचं, एवढा मातोश्रीला जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी प्रेम होत. तसेच कळवा शिवसेना शाखा तोडण्याचा पुरावा आम्ही मातोश्रीला दिला होता. तरी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या असा सवाल म्हस्के यांनी करत, आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व आहे असा प्रश्न म्हस्के यांनी विचारत, खुर्चीसाठी मातोश्री ने हिंदुत्व सोडलेलं आहे, त्यांनी त्यांच्या आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलावं आणि भूमिका मांडावी असे आवाहन केले आहे.

पुढे बोलताना, एकीकडे आव्हाड हिंदू देवतांबद्दल बोलतात आणि रात्रीचे बुवा आणि मांत्रिकांच्या मध्ये बसलेले असतात, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात आणि वेगवेगळ्या बुवा बाबांचे गंडेदोरे बांधतात ही बाब ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आव्हाडांचा कुठला आणि कसला अभ्यास, यापूर्वी ऋषी मुनींनी केलेला अभ्यास हा फेल आहे का, राज्य घटनेत सर्व जाती धर्माचा आदर करा असं म्हटलं आहे. महाराष्ट्र हिंदुस्थानातील लोकांची माथी भडकवण्याच काम जितेंद्र आव्हाड करत आहे, दंगली भडकवण्याचा  त्यांचा कट आहे.याची सरकारने चौकशी करावी असे ही म्हटले आहे.

 तर शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील या बद्दल बोलत नसतील तर त्यांनी वक्तव्याला समर्थन दिल आहे असं मानतो असेही म्हस्के यांनी म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड