शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उल्हासनगरातील पाणी टंचाईवर संयुक्त समिती, महापालिका उभारणार स्वतःचे पाणी स्रोत 

By सदानंद नाईक | Updated: August 25, 2023 16:58 IST

तसेच शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारे स्वतःचे पाणी स्त्रोत निर्माण करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

 उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुंबई दालनात झालेल्या बैठकीत महापालिका, एमआयडीसी व महावितरण यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारे स्वतःचे पाणी स्त्रोत निर्माण करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

 उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसी पाणी सोडले, त्याच वेळी वीज गुल झाल्यास, शहरातील विविध पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे उघड झाले. शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी उधोगमंत्री उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरवारी एक बैठक पार पाडली. एमआयडीसीच्या माध्यमांतून शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा करणे आणि स्वतंत्र पाण्याचे स्रोत उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

 शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसी, महावितरण आणि उल्हासनगर महापालिका प्रशासन यांची एकत्रितरित्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात यावी. याबाबत बैठकीत उद्योगमंत्री महोदयांनी आदेश दिले. पाणी पुरवठ्याचे वितरण वेळी वीज पुरवठा खंडित होऊ नये. याकडे लक्ष देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेच्या टप्पा क्रं-२ अंतर्गत महापालिका स्वतःचे पाण्याचे स्रोत उभारणार आहे. यासाठी महापालिकेने सविस्तर प्रस्ताव यापूर्वीच शासन दरबारी पाठविला असल्याची माहिती महापालिका पाणी पुरावठा विभागाने पाठविली आहे. 

टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022Waterपाणीwater shortageपाणीकपात