शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

By अजित मांडके | Published: April 21, 2023 4:41 PM

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खारघरच्या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे. परंतु त्यावर एकही वरीष्ठ नेता बोलण्यास तयार नाही. उलट त्याचे पाप आता दुस-याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेची साधी चौकशी देखील केली जात नाही. मात्र तिकडे पप्पीची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाते हे फार दुर्देवी असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. त्यातही राजकीय ताकद दाखविण्यासाठी हा अट्टाहास केला गेला असतांना आता कार्यक्रम दुपारी घेण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच सांगितल्याचे सांगत त्यांच्यावर आपले पाप ढकलण्याचा प्रकार केला जात असल्याची टीका देखील त्यांनी केली. परंतु या प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशाच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खारघरच्या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे. परंतु त्यावर एकही वरीष्ठ नेता बोलण्यास तयार नाही. उलट त्याचे पाप आता दुस-याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्य समिती नेमली आहे.  करीर हे अतिशय चांगले अधिकारी आहेत. परंतु मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी एखाद्या फाईलवर सही करायला सांगितले तर, अधिकारी त्यास नकार देत नाहीत. त्याचप्रमाणे नोकरशहा म्हणून ते सरकार चुकले हे सांगू शकतील का, हा प्रश्न आहे. त्यामुळेच एक सदस्य समिती ऐवजी निवृत्त न्यायधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यातही राज्य सरकारची समिती अशा घटना पुढे घडू नयेत म्हणून पर्याय सुचवेल. पण, उद्याच कोणी बघितले आहे. 

तसेच त्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एक सदस्य समिती तयार करून राज्याला मुर्ख बनविण्याचे काम करू नका, धुळफेक करू नका. हि दुर्घटना नेमकी कशी घडली आणि काय चुका झाल्या हे सर्व समोर येऊ द्या. त्यासाठीच न्यायालयीन चौकशी महत्वाची आहे. त्यात सर्व काही समोर येईलच, असेही ते म्हणाले. यापुर्वी अशा दुर्घटना घडल्यानंतर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. खारघर येथे उन्हात नागरिकांना बसविणे हे अमानवी कृत्य होते. त्यामुळेच राज्य सरकारने या दुघर्टनेची जबाबदारी घ्यायला हवी, असेही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड