शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

रेलनीरच्या उत्पादनांवर काकोळे गावाचा उल्लेख करावा; काकोळे ग्रामस्थांचा गांधी जयंतीला सत्याग्रह

By पंकज पाटील | Published: October 02, 2023 7:13 PM

काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

अंबरनाथ - रेल्वे प्रशासनातर्फे उत्पादित केल्या जाणाऱ्या रेलनीर उत्पादनांवर काकोळे गावाचा ठळक उल्लेख करावा, या मागणीला घेऊन आणि पाण्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी अनागोंदी कारभारा विरोधात, काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावात रेल्वेच्या मालकीचे जीआयपी तलाव असून त्याठिकाणी 2013 साली रेल्वे प्रवाश्यांना बाटलीबंद पाणी पुरवठा करण्यासाठी आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेलनीर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या काकोळे गावात रेल्वेने ब्रिटिशकाळात जीआयपी तलाव बांधला पण रेलनीर प्रकल्पावर काकोळे गावाचा कुठेही उल्लेख नाही. रेलनीर प्रकल्पावर काकोळे गावाचा नाव असावे या मागणीसाठी काकोळे गावचे सरपंच नरेश गायकर यांनी आज महात्मा गांधी जयंतीला रेलनीर प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले आहे. 

यासंदर्भात रेल्वे प्रशासन, रेल्वे राज्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याला प्रतिसाद लाभला नाही, त्यामुळे रेल प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन सुरू केल्याची माहिती गायकर यांनी दिली. त्याचप्रमाणे रेलनीर प्रकल्पाला लागणारी वाहतूक सेवा टीसीसीय वाहतूक संघटनेच्या माध्यमातून सुरळीत सुरू आह. असे असताना रेलनीरचे उतपादन घटत असल्याचे कारण सांगून विविध रेल्वे स्थानकांवर रेलनीर पाणीपुरवठा बंद केल्याने वाहतूक व्यवस्था करणाऱ्या मालवाहतूकदारांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. 

संबंबधित मालवाहतूकदार स्थानिक ग्रामस्थ असून त्यांच्यावरील अन्याय देखील दूर करावा या दोन्ही मागण्यांसाठी सरपंच गायकर यांनी आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, बंडू देशमुख, चैनू जाधव, विलास पाटील, सचिन जाधव, सुरेश जाधव, देविदास पाटील, गणेश गायकर, प्रकाश गायकर, सूर्यकांत गायकर आदींनी सहभागी होऊन सरपंच गायकर यांना पाठिंबा दर्शवला.

टॅग्स :agitationआंदोलनambernathअंबरनाथIndian Railwayभारतीय रेल्वे