शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

कल्याण-डोंबिवलीकर वाहतूककोंडीने त्रस्त

By admin | Published: March 04, 2016 1:36 AM

कल्याण-डोंबिवली शहरांतील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक सकाळ ते रात्री उशिरापर्यंत वाहतुकीने गजबजलेले असतात.

आकाश गायकवाड,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवली शहरांतील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक सकाळ ते रात्री उशिरापर्यंत वाहतुकीने गजबजलेले असतात. या सततच्या वाहतूककोंडीमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, व्यावसायिक, वाहनचालक हैराण झाले आहेत. शहरातील रस्ते, चौक तेच पण वाहने दामदुप्पट आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांसह वेड्यावाकड्या उभ्या असलेल्या रिक्षांच्या विळख्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्याचे प्रभावी उपाय लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये नसल्याने नागरिकांना वाहतूककोंडी सहन करावी लागत आहे.कल्याणमधील शिवाजी चौक, सहजानंद चौक, लाल चौकी, महात्मा फुले चौक, वलीपीर रस्ता, दीपक हॉटेल, महालक्ष्मी ते गुरु देव हॉटेल हे मुख्य रस्ते सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत वाहतूककोंडीने गजबजलेले असतात. गेली काही वर्षे कल्याण-डोंबिवली शहरांत दिवसा अवजड वाहनांना मज्जाव होता. ही वाहने रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत शीळफाटा ते दुर्गाडी किल्ला रस्त्याने ये-जा करीत असत. या वेळेवर वाहतूक पोलिसांचे यापूर्वी कडक नियंत्रण होते. आता कंटेनर, ट्रेलर व सर्व प्रकारची अवजड वाहने दिवसाढवळ्या या पोलिसांसमोरून कल्याण शीळफाटा, पत्रीपूल, शिवाजी चौकमार्गे दुर्गाडी पुलावरून भिवंडीच्या दिशेने जातात. ती शहरातून नेताना एका कोपऱ्यावर वाहतूक पोलीस आणि अवजड ट्रकचा चालक ‘हस्तांदोलन’ करतानाचे चित्र नागरिक पाहत असतात. तर, डोंबिवलीतही सकाळच्या वेळेस रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचालकांशी ‘हस्तांदोलन’ करताना शहर पोलीस आणि वाहतूक पोलीस सर्रास दिसतात. कल्याण शहरात भाजीबाजार, घाऊक बाजार असल्याने भिवंडी, शहापूर, मुरबाड, वाडा तालुक्यांतील व्यापारी वाहने घेऊन खरेदीसाठी कल्याणमध्ये येतात. नेहमीच्या वाहतूककोंडीत या वाहनांनी भर पडते. चाकरमानी, एमआयडीसी, उद्योग-व्यावसायिक मंडळी दररोज आपल्या वाहनाने ठाणे, मुंबई, पनवेल, नाशिक दिशेने जातात. शालेय विद्यार्थ्यांच्या बस अशा वाहनकोंडीचा अनोखा संगम दररोज कल्याण-डोंबिवलीत पाहण्यास मिळत आहे.डोंबिवली पूर्व भागातील फडके चौक, बाजीप्रभू चौक, दत्तनगर चौक, कोपर उड्डाणपूल, गावदेवी मंदिर, मानपाडा, सागाव रस्ता, डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानक भागातील पंडित दीनदयाळ चौक, गोपी चौक, महात्मा गांधी चौक, सुभाष चौक, रस्ते, सम्राट चौक सकाळपासून वाहतूककोंडीने गजबजलेले असतात. तुटपुंजे वाहतूक पोलीस या कोंडीवर नियंत्रण आणण्यात कमी पडत आहेत. शालेय बस, अवजड सामानाचे ट्रक, त्यात पालिकेची कचरा उचलणारी वाहने यात भर घालतात. रेल्वेने स्थानक भागात वाहनतळ सुरू करूनही नागरिक तेथे पैसे द्यावे लागतात म्हणून रस्त्यांच्या दुतर्फावाहने उभी करतात.