शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

कल्याण-मुरबाड रेल्वेचे घोडे सर्वेक्षणावरच अडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:08 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले.

- मुरलीधर भवारकल्याण  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले. या घोषणेला दोन वर्षे उलटूनही आतापर्यंत केवळ प्राथमिक सर्वेक्षणच झाले आहे. त्यापुढे केंद्र सरकारकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने या मार्गाचे घोडे पुढे सरकणार तरी कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.कल्याण-नगर हा मार्ग ब्रिटिशांच्या काळापासून रखडलेला आहे. त्याच्या मागणीसाठी १९९६ पासून रेटा सुरू आहे. हा मार्ग रखडल्याने कल्याणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले मुरबाड हे रेल्वेशी जोडले गेले नाही. मुरबाडमध्ये नागरीकरण वाढत असून शहराला नगरपंचायतीचा दर्जा आहे. त्यामुळे रेल्वे आवश्यक असून त्याचा फायदा शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांना होईल.कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाने २०११ साली केली होती. ४ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी या मार्गाची घोषणा केली होती. भाजपा आमदार किसन कथोरे यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. कल्याण-नगरमार्गासह कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. रेल्वेमार्गाची आखणी, स्थानके, त्यासाठीचा खर्च याविषयी अद्याप काहीच स्पष्टता नाही. प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार केला असला, तरी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा उपयुक्तता अहवाल प्रतिकूल असल्याची माहिती समोर येत आहे.प्राथमिक अहवालाला रेल्वे प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर तो रेल्वे बोर्डाच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर हे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे सोपवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. या मार्गावर लहानमोठे पूल, एक बोगदा आणि तीन स्थानके प्रस्तावित आहेत. कांबा-वरप, गोवेलीनाका आणि त्यानंतर मुरबाड रेल्वेस्थानक असेल, असा ढोबळ अंदाज असल्याची माहिती उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे. कल्याण-नगर हा रेल्वेमार्ग खाजगीकरणातून पूर्ण होऊ शकतो, अशी भूमिका दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी २००६ मध्ये मांडली होती.कल्याण-नाशिक लोकलसेवा लवकरच सुरू होणार आहे. या मार्गावर असलेल्या कसारा घाटात लोकलचे डबे कसे चढणार, असा तांत्रिक प्रश्न उपस्थित करून ही सेवा सुरू होणे कठीण असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी विशिष्ट गाड्या तयार करून या अडचणीवर मात करण्यात आली असून त्या धावण्यासाठी सज्ज आहेत. कल्याण-नाशिक लोकलचा खडतर मार्ग प्रत्यक्षात येत असताना कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गही पूर्ण करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.३५० कोटींची लागणार तरतूद : रेल्वे प्रवासी संघटनेला माहितीच्या अधिकारामध्ये कल्याण-नगर रेल्वेमार्गासाठी पहिल्या टप्प्यात ७२१ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. हा खर्च गृहीत धरल्यास कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची प्राथमिक तरतूद करावी लागणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkalyanकल्याणmurbadमुरबाड