शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

कोकणी माणसाने हातात काम घेतले कि मागे हटत नाही : डॉ. महेश केळुस्कर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 16:53 IST

ठाण्यात ८५ तास सलग चालणाऱ्या कवीसंमेलनास आजपासून सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देकोकणी माणसाने हातात कामी घेतले कि मागे हटत नाही : डॉ. महेश केळुस्कर ठाण्यात ८५ तास सलग चालणाऱ्या कवीसंमेलनास सुरुवातकविसंमेलनात राज्यातील १००० पेक्षा जास्त  कवी सहभागी

ठाणे - कविता भावनांचा अविष्कार असतो . निकड असल्याशिवाय कागदावर उतरवू नये .  तरच कविता आतून येते , अस्सल येते . शब्दांना अर्थ नसेल तर काव्य नसेल तर पोकळ असते .  शब्दाला वजन असते , शब्द पाळण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत असते . त्यामुळे कवींनी आपल्यता शब्दाला वजन आहे का हे पाहणे गरजेचे आहे . कोकणी माणसाने हातात काम घेतले कि मागे हटत नाही . त्याप्रमाणे ८५ तास सलग चालणार्या कवी संमेलनाचे आयोजन कौतुकास्पद आहे  अशा भावना कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी व्यक्त केल्या. 

          अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने सलग ८५ तास चालणारे कविसंमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात राज्यातील १००० पेक्षा जास्त  कवी सहभागी होणार  आहे. या कविसंमेलनाचे उदघाटन  डॉ . केळुस्कर यांच्या काव्यवाचनाने  झाले . कवी जेव्हा माझया मनातलं बोलत आहे असे वाटते तेव्हा आपण त्या कवितेशी समरस होतो . कविता न लिहणारे कवी असतात , परंतु कवी हे बोलके रसिक असतात असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी  पुढे म्हणाले कि, कवी संमेलनासारखे उपक्रम साहित्य विश्वात चैतन्य निर्माण करतात. त्यामुळे असे उपक्रम आयोजित करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी ' झिनझिनाट ' ही मालवणी बोलीभाषेतील कविता सादर केली .          ज्येष्ठ साहित्यिका डॉ . विजया वाड '' सु सु सुट्टी , शाळेला बुट्टी '' ही कविता सादर करत ८५ तास काव्य संमेलनासाठी शुभेच्छा आयोजकांना दिल्या . ज्येष्ठ कवी शशिकांत तिरोडकर यांनी सादर केलेलया  ' मिठी ' या कवितेला रसिकांची विशेष दाद मिळाली . या प्रसंगी डॉ . ज्योती परब यांच्या ' शब्दसुमने ' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ . विजया वाड आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रा . दिनेश गुप्ता , ख . र . माळवे , डॉ , ज्योती परब , अखिल भारतीय कला , क्रीडा , सांस्कृतिक अकादमी प्रमुख साक्षी परब , वृषाली शिंदे, आरती कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थितीत होते. या संमेलनाचा समारोप 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे कवी अशोक नायगावकर व अँड राजेंद्र पै  उपस्थितीत राहणार आहेत. माजी खासदार व पत्रकार भारतकुमार राऊत अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत . या संमेलनात दोन तासांचे  कवितांचे सत्र आयोजित करण्यात आली आहेत.  लहान मुले, विद्यार्थी, अंध, दिव्यांग, पोलीस, स्त्रिया अशा विविध घटकांसाठी स्वतंत्र सत्र होणार  आहे.या संमेलनात कवी गोविंदाग्रज, विष्णू सूर्या वाघ आणि ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने उभारण्यात येणार्या काव्यमंचावर कवितांचे वाचन होणार आहे. कवी केशवसूत कट्ट्यांतर्गत विविध कवितां संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जुन्या - नव्या कवींच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही या संमेलनात भरवण्यात आले आहे .

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई