शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

श्रमजीवी संघटनेचा सफाई व उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारासाठी पुन्हा आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 20:01 IST

काही पदाधिकारी आणि अधिकारी पगार होऊ देत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने आज बुधवारी पुन्हा आंदोलन केले. 

मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई व उद्यान विभागातील कामगारांचा पगार देण्यासाठी आयुक्तांनी धनादेश तयार करून ठेवलेला असतानादेखील काही पदाधिकारी आणि अधिकारी पगार होऊ देत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने आज बुधवारी पुन्हा आंदोलन केले. 

महापालिकेतील दैनंदिन साफसफाईसाठी ठेकेदार नेमलेला असून सदर ठेकेदाराच्या माध्यमातून शार सफाईचे काम कंत्राटी सफाई कामगार करत आहेत. तर पालिकेच्या उद्यान विभागात देखील ठेक्याने मजूर काम करत आहेत. सदर कामगारांना सप्टेंबर संपायला आला तरी ऑगस्ट महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांनी पालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाबाहेर शुक्रवारी सायंकाळी धरणे आंदोलन केले होते.

श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्याशी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड आणि उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी चर्चा केली. महापालिकेकडे असणारा निधी अपुरा असून, राज्य सरकारकडून अनुदान येत नाही. त्यामुळे कामगारांचा पगार द्यायला उशीर होतो. बुधवारपर्यंत कामगारांचे पगार होतील. यापुढे आधी पगार सफाई कामगारांचा होईल त्यानंतर इतर विभागाचे पगार करू, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. 

आयुक्तांच्या आदेशानुसार ठेकेदाराचा धनादेश तयार करून ठेवला होता. परंतु पालिकेतील काही पदाधिकारी हे अधिकाऱ्यांना हा पगार करू देत नव्हते. याची माहिती पंडित यांनी आयुक्तांना कळविल्यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाई करीत उद्याच पगार करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला.  परंतु आज बुधवारी पगार झाला नाही म्हणून दुपारी ३ वाजता आपले काम पूर्ण केल्यावर कंत्राटी कामगारांनी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे एकत्र जमून पगार रोखणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा निषेध केला. 

पगार रखडल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक अडचण होत असून घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. अनेकांना घरभाडे भरणे शक्य होत नाही. प्रवासासाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती कामगारांची झाल्याने पालिकेने कामगारांची काळजी घेतली पाहिजे, असे श्रमजीवीचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल म्हणाले. ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप गोतारणे यांच्या सहकार्याने प्रभारी अध्यक्ष मंगेश मोरे, चेतन पाटील, रत्नाकर पाटील, हनुमंता जाधव, दिगंबर मेहर, संदीप पाटील, दीपक पाटील, इरफान शेख रमेश गोरेकर आणि इतर संघटक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले, असे प्रवक्ते मंगेश मोरे यांनी सांगितले.