शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

लाल बावटा रिक्षा युनियन काळ्या फिती बांधून करणार सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:42 AM

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : २०१४ साली भाजपने खोटे बोलून व ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : २०१४ साली भाजपने खोटे बोलून व ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून आतापर्यंत या सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करीत, याचा निषेध म्हणून लाल बावटा रिक्षा युनियनतर्फे २६ मे रोजी काळा दिवस साजरा करण्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमासकर यांनी बुधवारी केली. ३० मे रोजी शहरात काळ्या फिती बांधून निषेध करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मोदी सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप करीत, त्याचा पाढाच कोमासकर यांनी यावेळी वाचला.

कोरोना पसरवण्याससुद्धा मोदी सरकार जबाबदार आहे. सुरुवातीला पूर्ण देश लॉकडाऊन करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केले पाहिजे होते. दिल्लीच्या पाच सीमांवर हजारो शेतकरी सहा महिन्यांपासून न्यायासाठी बसले आहेत. त्यांच्याबाबत सरकार अडेलतट्टू भूमिका घेत आहे. ७ वर्षांत शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, दुकानदार, रिक्षावाले, फेरीवाले इत्यादी कष्टकरी नागरिकांसह कोरोनाग्रस्त रुग्णांनाही न्याय देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कोमासकरर यांनी केला. देशभरातील शेकडो कामगार, शेतकरी संघटनांनी २६ मे हा काळा दिवस घोषित करून सरकारचा निषेध करण्याचे ठरवल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला डोंबिवलीतील संघटनेचे रिक्षाचालक सदस्य काळे झेंडे व काळ्या फिती बांधून निषेध करणार आहेत.