शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

भूसंपादन अधिकाऱ्यांना रोखले

By admin | Published: August 30, 2016 2:42 AM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याकरिता सोमवारी तालुक्यातील धसई गावात गेलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी

शहापूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याकरिता सोमवारी तालुक्यातील धसई गावात गेलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी रेवती गायकर आणि तहसीलदार अविनाश कोष्टी यांना संतप्त शेतकऱ्यांनी गावच्या वेशीवर अडवले. ‘चले जाव’च्या घोषणा देत संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरश: हाकलून लावले.महाराष्ट्र शासन आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या द्रुतगती महामार्गाच्या २७ किमी अंतरासाठी शहापूर तालुक्यातून अंदाजे ४०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. शहापूर तालुक्यातील २७ गावांमधून हा महामार्ग जात असून यात आर्जुली, आंदाड, हिव, रास, सरलांबे, शेलवली, सापगाव, खुटघर, शेलवली, कासगाव, शिरोळ, शेई, चांदे, मढ धसई, कासगाव, गोलभन, दळखण, बिरवाडी, खुटारी, रातअंधळा, कसारा, वाशाळा, विहीगाव या गावांचा समावेश आहे. पुनर्वसनाबाबत शेतकऱ्यांसमोर असलेल्या पर्यायांची माहिती देण्याकरिता तहसीलदार कोष्टी आणि भूसंपादन अधिकारी रेवती गायकर धसई गावात शिरत असताना शेतकऱ्यांनी त्यांना रोखले. ‘अधिकाऱ्यांनो चालते व्हा’, ‘रस्त्यासाठी जमीन देणार नाही’, ‘भातसा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही’, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परतवून लावले. तसेच समुपदेशन करणाऱ्या तिघाचौघांना जमावाने धक्काबुक्की केली. माजी आमदार दौलत दरोडा, सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे, महिला राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, महिला काँग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष अपर्णा खाडे आदी या वेळी उपस्थित होते. तहसीलदार कोष्टी म्हणाले की, या महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला ग्रामस्थांनी जाऊ दिले नाही. विरोध करणारे नेमके लाभार्थी होते की अन्य कोणी, हे समजू शकले नाही, असे ते म्हणाले.