शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

देशातील मच्छीमारांना जमीन व सागरतळावर हक्क द्यावा; नॅशनल फिश वर्कर्स फोरमची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 7:15 PM

देशाच्या सागरी किनारपट्टी वरील मच्छीमारां मध्ये न्याय हक्काच्या जनजागृतीसाठी ३ मे पासून पश्चिम बंगाल ते गुजरात अशी सागरयात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

मीरारोड: जंगल पट्टीत वावरणाऱ्यांना याप्रमाणे वन जमिनीचे अधिकार दिले जातात त्याच प्रमाणे देशातील मच्छिमारांना सुद्धा ते वापरत असलेल्या जमीन व सागरतळाचा अधिकार केंद्र सरकारने द्यावा, अशी मागणी भाईंदरच्या उत्तन येथे नॅशनल फिशवर्कर्स फोरमच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत करण्यात आली आहे . देशाच्या सागरी किनारपट्टी वरील मच्छीमारां मध्ये न्याय हक्काच्या जनजागृतीसाठी ३ मे पासून पश्चिम बंगाल ते गुजरात अशी सागरयात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

सात सागरी राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील मासेमार समाजाचे प्रतिनिधीत्व करणा-या फोरमच्या उत्तन येथे झालेल्या सभेत नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष लिओ कोलासो, सरचिटणीस ओलॅसिवो सिमोइज, महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल व सरचिटणीस किरण कोळी,  सागरी व जमिनीचे कायदे तज्ञ विजयन श्रीम. जेसूरत्थनम ख्रिस्ती, सोन यादव, अनिल वर्गीस यांनी मार्गदर्शन केले.  फोरमचे जॅक्सन (केरळ) , जॉन्स (तामिळनाडू), अलय्या (ओडिशा) , लक्ष्मी यांनी तसेच काही राज्यांच्या संघटनांनी ऑनलाईनने चर्चेत भाग घेतला. 

देशास ८६०० कि.मि. चा सागर किनारा आहे. किनारपट्टीवर मच्छीमार समाज आजही मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसायात आहे. मात्र पिढ्या न पिढ्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना त्यांची राहती घरे , मासळी विक्री - स्टोरेज व सुकवण्याच्या जागा, बोटी ठेवण्यासह त्या दुरुस्ती आदींच्या जमिनी देश स्वतंत्र होऊन ही अजून मच्छिमारांच्या  नावावर केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेचे खरे तटरक्षक असूनही मच्छीमारांचे जीवन अशाश्वत आहे. 

तशातच सरकारने समुद्रात सुद्धा व्यापारी भूमिका घेऊन उद्योगपतींना कराराने देवून तेथे मासेमारी करणा-या मच्छीमारांना हद्दपार करण्याचा घाट बांधला आहे. त्यावर बैठकीत चर्चा होऊन मच्छीमार  समाजाचे अस्तित्व व त्यांचे हक्क अधोरेखित करण्यासाठी किना-यावरची जमिन व सागर तळावरही हक्क मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही महसूल खात्याने मासेमारांना त्यांच्या जमिनीवरील वहीवाटीचे हक्क देणारा शासन निर्णय २०११ मध्ये घेऊनही तो आजपर्यंत दाबून ठेवला असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांनी मच्छिमारांच्या या न्याय हक्काच्या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालून न्याय द्यावा अशी विनंती महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केली आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर