शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

कुठलीही बंदुकीची गोळी विचार संपवू शकत नाही; दामोदर मावजो यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 9:50 AM

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हिटलिस्टवर माझे नाव होते, मला संरक्षण देण्यात आले; पण...; ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो स्पष्टच बोलले...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हिटलिस्टवर माझे नाव असल्याचे गुप्तचर यंत्रणेकडून कळले व मला संरक्षण देण्यात आले; पण लेखक म्हणून मला संरक्षण नकोय. कारण, त्यामुळे माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते. चार वर्षे झाली माझ्यावर अजून गोळी झाडली गेलेली नाही. मात्र, कुठलीही बंदुकीची गोळी माझा विचार संपवू शकत नाही, असे परखड वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ लेखक दामोदर मावजो यांनी शनिवारी केले.

मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे या ग्रंथदालनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनास शनिवारपासून सुरुवात झाली. त्याचे पहिले पुष्प मावजो यांनी गुंफले. निर्माते जयप्रद देसाई यांनी त्यांना बोलते केले. मुलाखतीत त्यांनी वरील मत व्यक्त केले. मावजो म्हणाले की, साहित्यिकांनी राजकारण करू नये हा भूमिकेला माझा विरोध आहे. साहित्यिकांनी जरूर राजकारण करावे; पण पक्षाचे राजकारण करू नये. मी निर्भिडपणे, पण जबाबदारीने बोलतो म्हणून काही लोकांना मी आवडत नाही. आम्ही प्रामाणिकपणे बोलतो आणि म्हणूनच बोलण्याला नकळत धार येते. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर माझे नाव हिटलिस्टवर आले. खरं तर गोव्यात माझा एकही शत्रू नाही. माझ्या मतांना विरोध करणारे आहेत; पण मला वैयक्तिक विरोध करणारे नाहीत. गुप्तचर यंत्रणेने मला सांगितले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकात जाऊ नका, तिथे तुमच्या जिवाला जास्त भीती आहे; पण मी सगळीकडे फिरणार असे सांगितले. त्यानंतर मी कर्नाटकात गेलो. आज महाराष्ट्रात आलो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे