शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

रत्नाकर मतकरी यांनी मला पाठवलेले पत्र आज डोळ्यांसमोर आले : रामदास खरे यांनी सांगितल्या आठवणी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 18, 2020 3:01 PM

रत्नाकर मतकरी याना रामदास खरे यांनी पत्र लिहिले होते.

ठळक मुद्देमतकरी यांनी विस्तृत पत्र लिहिले होते : खरे

ठाणे : ज्येष्ठ नाटककार, लेखक रत्नाकर मतकरी यांचे प्रकाशित झालेले संदेह हे पुस्तक वाचनात आल्यावर मी त्याचा अभिप्राय पाठवला होता. तसेच त्याचे नुकतेच प्रदर्शित झालेले बकासुर हे नाटक आमच्या ठाण्यात कधी येणार अशी विचारणा केली होती. त्यावर त्यांनी विस्तृत असे उत्तर पत्राने दिले होते. ते पत्र आज डोळ्यासमोर पुन्हा उभे राहिले आणि माझे मत अलगद भूतकाळात रमू लागले अशा भावना ठाण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक रामदास खरे यांनी व्यक्त केल्या.     

खरे त्यांच्या आठवणी सांगताना म्हणाले की,  माझ्यापाशी रत्नाकर मतकरी यांचे दि २ सप्टेंबर १९९८ चे एक दुर्मिळ पत्र आहे. रत्नाकर मतकरींच्या अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. कथा, कादंबरी, एकांकिका, दीर्घांक, दूरदर्शन मालिका, नाटक, चित्रपट अशा सर्व माध्यमांवर जबरदस्त हुकूमत असणारे आणि बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, आणि  व्यावसायिक रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करणारे प्रयोगशील नाटककार, गूढकथाकार, कादंबरीकार रत्नाकर मतकरी यांची चटका लावणारी एग्झिट मन व्याकुळ करून गेली. सर्वात महत्वाचे म्हणजे मतकरींनी लेखनाबरोबरच सामाजिक बांधिलकी प्राणपणाने जपली, वाढवली. 'वंचितांच्या रंगमंचाचे ते प्रणेते होते. ठाण्यामध्ये या रंगमंचाच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमास मतकरी सर आवर्जून उपस्थित राहत आणि मार्गदर्शन करीत.  साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते माजी विश्वस्त होते. १९५५ मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांची 'वेडी माणसं' ही पहिलीवहिली एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून प्रसारित झाली आणि त्यानंतर अगदी कालपर्यंत अखंडपणे त्यांचे लेखन,वाचन सतत सुरूच होते. लोककथा-७८ या नाटकाने तर इतिहास घडवला. पुढे दुभंग, अश्वमेघ, खोल खोल पाणी, जावई माझा भला, घर तिघांचं हवं, माझं काय चुकलं ?, आणि अलीकडचे आरण्यक व  इंदिरा या नाटकांनी नाट्यरसिकांच्या मनामध्ये तर खास घर केले होते . खास मुलांसाठी अलबत्या गलबत्या आणि निम्मा शिम्मा राक्षस तर सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालीत आहेत. कादंबरी लेखनाबरोबरच खास मतकरी शैलीत त्यांनी साकारलेल्या गूढ कथा म्हणजे वाचक रसिकांसाठी मोठी पर्वणीच. ३० ते ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या गूढकथा अजूनही वाचकांना चकवा देतात. मतकरींची वाङ्मयसंपदा समृद्ध आहे. मोठ्यासाठी ७० तर मुलांसाठी २२ नाटके त्यांनी लिहिली. २० कथा संग्रह, तीन कादंबऱ्या, १२ ललित लेख संग्रह, आणि 'माझे रंगप्रयोग' हा आत्मचरित्रामक ग्रंथ. गहिरे पाणी, अश्वमेघ, बेरीज वजाबाकी या दूरदर्शन मालिका, इन्व्हेस्टमेंट सारखा आशय घन चित्रपट असे बरेच लेखन,  प्रयोग ते सतत न थकता करीत होते. आत्तापर्यंत मतकरी सरांना विविध संस्थांचे, शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. गेले वर्षभरात मतकरी सरांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनेकवेळा छानसा योग आला. अधोरेखित-२०१९  या दिवाळी अंकाचे प्रकाशन आम्ही मागील वर्षी त्यांच्या दादरच्या निवासस्थानी केले, तेव्हा त्यांच्याशी मारलेल्या गप्पा या सदैव आठवणीत राहतील अशा. अनेक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने विविध ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधता आला.

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक