शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

भिवंडीतील दोन आदिवासी मुलांची वेढबिगारीतून मुक्तता

By नितीन पंडित | Published: September 20, 2022 7:21 PM

इगतपुरी येथील घटनेनंतर श्रमजीवी संघटनेने अशा प्रकारच्या वेठबिगरीसाठी राबणाऱ्या मुलांचा शोध घेतला असता भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेढबिगारी साठी राबविले जात असल्याचे उघड झाले आहे.

भिवंडी - इगतपुरी तालुक्यातील गौरी आगविले या मुलीच्या संशयास्पद मृत्यू नंतर नाशिक अहमदनगर भागात लहान बालकांना मेंढया राखण्यासाठी मेंढपाळांनी त्यांच्या पालकांना कवडीमोल दाम देऊन मुलांना घेऊन गेल्याचे उघड झाल्या नंतर या प्रकरणांमध्ये श्रमजीवी संघटनेने पाठपुरावा करून दोन वेठबिगार बाल कामगारांची सुटका केली असून सोमवारी पडघा पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगतपुरी येथील घटनेनंतर श्रमजीवी संघटनेने अशा प्रकारच्या वेठबिगरीसाठी राबणाऱ्या मुलांचा शोध घेतला असता भिवंडी तालुक्यातील दोन मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेढबिगारी साठी राबविले जात असल्याचे उघड झाले आहे. राहुल दिलीप पवार वय १७ व अरुण रामू वाघे वय १२ असे वेठ बिगरीतून मुक्त केलेल्या मुलांची नावे आहेत.

पडघा नजीकच्या वडवली येथील खोताचा पाडा येथील दिलीप पवार यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील भिवा गोयकर रा.ताजु ता. कर्जत हा येऊन त्याने आपल्याकडे मेंढया राखण्यासाठी कामगाराची गरज असल्याचे सांगत त्यांचा सतरा वर्षांचा मुलगा राहुल यास आपल्या सोबत देण्याची मागणी केली व मुलाचे लग्न पण आपण लावून देऊ असे सांगत कुटुंबियांना फक्त १५०० रुपये देऊन सोबत घेऊन गेला .मागील दीड वर्षे त्यास आपल्याकडे ठेवून त्याच्या कडून शारीरिक श्रमाची कामे करून घेत होता व त्यास कामाचे पैसे देखील न देता त्याची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केली.

तर दुसऱ्या प्रकरणात पडघा नजीकच्याच वाफाळे येथील सागपाडा येथील रामू वाघे यांच्या गावात मागील वर्षी मेंढ्या घेऊन आलेले मेंढपाळ संभाजी खताळ रा. ढवळपुरी ता पारनेर जि अहमदनगर याने आपली पत्नी नेहमी आजारी असल्याने मेंढ्या राखण्यासाठी कामगाराची गरज असून मुलगा अरुण यास महिना ५०० रुपये मोबदला देऊन आपल्या सोबत घेऊन गेले.सुमारे दीड वर्षे अरुण हा संभाजी खताळ यांच्या कडे काम करीत होता.इगतपुरी येथील घटनेच्या वाच्यते नंतर मेंढपाळाने अरुण यास त्याच्या घरी आणून सोडले.ही बाब श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या जया केशव पारधी, आशा नारायण भोईर,मारुती भांगरे,संतोष भेरे यांना समजताच या वेढबिगारी म्हणून राबलेल्या मुलांसह त्यांच्या पालकांना घेऊन पडघा पोलीस ठाण्यात भिवा गोयकर व संभाजी खताळ या दोन मेंढपाळां विरोधात वेठबिगारी उच्चाटन अधिनियमासह विविध कालमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणानंतर श्रमजीवी संघटनेने अधिक आक्रमक झाली असून अशा प्रकारच्या वेठबिगरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असून वेठबिगारी मुक्त मजुरांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देणे गरजेचे आहे तसेच पडघा पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी