शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

डायघर कचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; १ सप्टेंबर पासून डायघर येथे कचरा प्रकल्प सुरु करणार

By अजित मांडके | Updated: August 16, 2023 15:58 IST

स्थानिकांनी येथील प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे.

ठाणे : भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता १ सप्टेंबर पासून महापालिका डायघर येथे कचरा प्रकल्प सुरु करणार आहे. परंतु हा प्रकल्प देखील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांनी येथील प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. मागील कित्येक वर्षात येथील गावांना मुलभुत सोई सुविधा देण्यात आलेल्या नसतांना आता कचरा आमच्या दारी कशासाठी असा सवाल करीत येथील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

ठाणे शहरात आजच्या घडीला १ हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होत आहे. हा कचरा सुरवातीला दिवा येथे टाकला जात होता. मात्र येथील कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. त्यानंतरही मागील कित्येक वर्षे हा प्रकल्प येथे सुरु होता. अखेर दिड वर्षापूर्वी येथील कचरा प्रकल्प बंद करण्यात आला. त्यानंतर डायघर येथे कचरा प्रकल्प सुरु करण्याचा मानस पालिकेचा होता.

मागील २००८ पासून याठिकाणी प्रकल्प सुरु करण्यासाठी महापालिकेची तयारी होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच स्थानिकांचा झालेला टोकाचा विरोध यामुळे हा प्रकल्प सुरु करता आला नव्हता. त्यामुळे दिवा येथील डंम्पीग बंद केल्यानंतर पालिकेने तात्पुरत्या स्वरुपात भंडार्ली येथे कचरा प्रकल्प सुरु केला होता. परंतु ऐन पावसाळ्यात येथील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला. शेतीचे होणारे नुकसान, विविध आजारांचे वाढते प्रमाण यामुळे हा प्रकल्प तत्काळ बंद करण्याची मागणी करीत स्थानिकांनी आंदोलन केले होते. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रकल्प ३१ आॅगस्ट नंतर बंद होणार असल्याचे स्पष्ट केले. तर डायघर येथील पालिकेच्या जागेवर कचरा प्रकल्प सुरु केला जाईल असेही स्पष्ट झाले होते. त्यानुसार डायघर येथे कचºयापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्यचा पालिकेचा मानस आहे. याठिकाणी त्यासाठी मशनरी देखील आल्याचे पालिकेने सांगितले आहे. परंतु आता या कचरा प्रकल्पाला देखील स्थानिकांनी पुन्हा विरोध करण्यास सुरवात केली आहे. १५ आॅगस्टच्या दिवशी येथील काही गावकºयांनी दत्त मंदिरात बैठक घेऊन या प्रकल्पाला विरोध केला आहे.  या बैठकीत पंचक्रोशी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून काही झाले तरी कचरा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

येथील देसाई शिळ, डायघर, पडले, देसाई, खिडकाली या ग्रामस्थांनी प्रत्येक गावा-गावात मिटिंग घेऊन विरोध करण्याचे ठरवले आहे.  भारतीय स्वातंत्र्य दिनी डायघर गाव येथील दत्त मंदिरात झालेल्या बैठकीत डायघर डंपिंगला विरोध करण्यात आला. मुलभुत सोई सुविधा अद्यापही आम्हाला मिळालेल्या नाहीत, साधा डायघर गावासाठी रस्ता देखील नाही, गटार, पायवाटांचा अभाव आहे, असे असतांना कचरा प्रकल्पामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा पंचक्रोशी संघर्ष समितीचे पदाधिकारी जितेंद्र पावशे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे