शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शिवसेनेकडून सोशल मिडियाचा प्रभावी वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 22:58 IST

मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार पोहोचला शिगेला

कल्याण : मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. घरोघरी भेटी, रॅली, चौकाचौकांमध्ये छोटेखानी सभा, यातून प्रचाराची रंगत वाढत आहे. शिवसेनेने प्रचारासाठी सोशल मिडीयाचाही प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्रामवर भर दिला आहे.सोशल मीडियाचा प्रभावी वापर पहिल्यांदा २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत झाला होता. त्यामुळे सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही उमेदवार आणि राजकीय पक्षांनी त्याला प्राधान्य दिले आहे. कल्याण मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, अशी प्रमुख लढत येथे होणार आहे. छोटेखानी सभा आणि प्रचार रॅलीतून मतदारसंघ पिंजून काढत असताना सेनेने सोशल मीडियाद्वारे प्रचारासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम नेमली आहे.कशी चालते यंत्रणा?प्रचार रॅली तसेच चौकसभा या धामधुमीतही दिवसभरात कोणत्या पोस्ट व्हायरल करायच्या, याचे नियोजन करण्यात येते.च्पोस्टमध्ये प्रामुख्याने शिंदे यांचा प्रचार दौरा व रॅली, सभांचे वेळापत्रक प्राधान्याने दिले जाते. फेसबुक, टिष्ट्वटरवरही विक ासकामांच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. शिंदे यांची प्रचार रॅली सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक लाइव्हचा आधार घेतला जात आहे. अंतिम टप्प्यात होणाऱ्या मोठ्या सभाही फेसबुक लाइव्ह केल्या जाणार आहेत.यू-ट्युब, फेसबुक, ट्विटर हीच हत्यारेसेनेची सोशल मिडीया टीम शॉर्टफिल्म तसेच यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप आदी फ्लॅटफॉर्मवर प्रचाराच्या पोस्ट टाकत आहे. शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना त्यावर प्राधान्य दिले जात आहे. डोंबिवली पूर्वेतील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रमुख वॉररूम उघडली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याणShiv Senaशिवसेना