शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

By संदीप प्रधान | Updated: April 30, 2024 04:53 IST

भाजपने अगदी सुरुवातीपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ आपण लढवणार, असे वातावरण निर्माण केले.

संदीप प्रधान

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे प्रतिष्ठेची जागा आहे. नेमके हे हेरुन भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि दक्षिण मुंबई हे तीन मतदारसंघ पदरात पाडून घेतले आहेत. ठाण्यातील निवडणुकीत शिंदेसेनेला कसे व किती यश मिळते, यावर भाजपचे विधानसभा निवडणुकीतील डावपेच अवलंबून राहतील.

भाजपने अगदी सुरुवातीपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ आपण लढवणार, असे वातावरण निर्माण केले. त्याचवेळी शिंदेसेनेच्या काही मातब्बर उमेदवारांचे तिकीट कापायला भाग पाडून दबावतंत्राचे राजकारण सुरू केले. मुख्यमंत्रिपद शिंदेसेनेकडे असताना जर ठाणे मतदारसंघ गमावला तर शिवसैनिकांत अत्यंत विपरित संदेश जाईल, या कल्पनेने शिंदेसेनेत अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे शिंदे यांनीही खेळी केली. त्यांनी कल्याणमधून आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली नाही. जोपर्यंत ठाण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कल्याणचा उमेदवार जाहीर होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शिंदे यांच्या या खेळीला छेद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत यांची उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली.

ठाण्यावरील दावा भक्कम करायचा व त्या बदल्यात एकेक मतदारसंघ काढून घ्यायचा, असे भाजपचे डावपेच सुरू होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण हे लढण्यास उत्सुक होते. मात्र, भाजपला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा होता. तो मिळवण्यात भाजप यशस्वी झाला. पालघर मतदारसंघातील राजेंद्र गावित यांनी मागील वेळी शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवायचे आहे. पालघर हाही भाजपच्या पदरात येणार आहे. दक्षिण मुंबईवरून भाजप व शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अथवा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडवून घेण्यात भाजप जवळपास यशस्वी झाला आहे. ठाण्याची जागा प्रतिष्ठेची केली नसती तर हे मतदारसंघ मिळाले नसते, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

विधानसभेची गणिते

ठाण्यात शिंदेसेनेच्या चिन्हावर निवडणूक होणे, ही भाजपचीही गरज आहे. शिंदेसेनेला कसे यश लाभते, यावर विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा निर्णय अवलंबून राहील. भाजपने ठाणे खेचून घेतले असते व शिवसेनेचे चिन्ह नाही म्हणून शिवसैनिकांची मते उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे गेली तर शिंदेसेना त्याचेच भांडवल करेल, याची भाजपला कल्पना आहे. भविष्यात विधानसभा व महापालिका निवडणुकीपासून भाजप आपली मांड पक्की करणार असल्याचेही भाजपच्या नेत्याने स्पष्ट केले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thaneठाणे