शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन 

By अजित मांडके | Published: May 18, 2024 5:03 PM

ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा मी गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अजित मांडके,ठाणे :  ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. ठाण्यात १४ पैकी १२ वेळा महायुती जिंकली आहे. त्यामुळे आताची निवडणुक ही प्रतिष्ठेची असून ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा, मी गुलाल उधळायला येतो असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठाण्यात शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केले. ठाण्याची जागा अधिक मताधिक्याने येणार असल्याच्या आकडेवारीत आहेत. परंतु त्यामुळे गाफील राहू नका, अधिकाधिक मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा असेही ते म्हणाले. २० तारखेला आराम करायचा नाही. आधी स्वत: कुटुंबासह मतदान करायचे त्यानंतर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. शेवटच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही. जास्तीत जास्त मतांनी ठाण्याची जागा आली पाहिजे. 

महायुतीला मतदान करायचे हे जनतेनं ठरवलं आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी ठाणे जिकांयचे असल्याचेही ते म्हणाले. परंतु दुसरीकडे नगरसेवकांनी देखील या निवडणुकीत काम करुन दाखविले पाहिजे, पुढील काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे आता पासून त्याची तयारी करा अन्यथा तुमचे प्रगती पुस्तक कसे असेल हे लक्षात ठेवा, त्या प्रगतीपुस्तकावरच तुमचे काय करायचे हे ठरविले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांचा देखील खरपुस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणतात, ४८ पैकी ४८ जागा जिंकणार. परंतु ते ४८ पैकी ५१ जागाही आणू शकतात का? अशी खिल्ली त्यांनी उडवली. तसेच देशाची काय दिशा असेल ते मोदींनी मुंबईत येऊन सांगितले. पुढील १० वर्ष भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते. महायुती विकासाचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शिव्यापासून सुरुवात करतात आणि शिव्याच देतात आमची शिवसेना आणि त्यांची शिव्या सेना आहे अर मुख्यमंत्री म्हणाले. मोदी नकली सेना म्हणाले तर मग उद्धव ठाकरेंना मिरची का झोंबली. तुमको मिरची लगी तो मी क्या करू? असा खोचक टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.

दरम्यान, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे ती टिपू सुलतानचे नारे लावू शकते का? याकूब मेमन कबर, पाकिस्तानचे झेंडे वापरत आहे, प्रचारात व्होट जिहाद मागत आहे. मग ती काय आहे? असली शिवसेना कसली नकलीच शिवसेना आहे. असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत पण विचाराचे नाही. राज ठाकरे, एकनाथ शिंदे हे विचाराचे वारसदार आहे. उद्धव ठाकरेंना आरएसएस ध्वज फडके वाटते, शिव भगवे ध्वज फडके वाटू लागेल. आज भारत कोणालाही रोखू शकतो. आपण नवभारतासाठी काम करत आहोत. लोकांच्या मनात मोदी असल्याचे सांगत  तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान बनवायचे असंही फडणवीसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे