शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

‘लोकमत’चा दणका: बैलगाड्यांच्या शर्यती भरविणाऱ्यांवर गुन्हा, कायमस्वरूपी कारवाई गरजेची 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 7:49 AM

अंबरनाथ तालुक्यातील ऊसाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाकाळात बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील ऊसाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाकाळात बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ऊसाटणे गावाच्या माळरानावर २३ मे रोजी सकाळी बैलगाड्यांची शर्यत आयोजित केली होती. बैल गाड्यांच्या शर्यतीवर बंदी असतानादेखील अशा प्रकारची शर्यत भरवल्याप्रकरणी आणि शर्यतीसाठी गर्दी जमवल्याप्रकरणी चार जणांविरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात प्रवीण पाटील, महेश पाटील, सचिन भंडारी आणि गुरुनाथ पाटील या आरोपींचा समावेश आहे.अंबरनाथच्या ग्रामीण भागात बेधडकपणे अनेक बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात येत असतात. या बैलगाडी शर्यतीकडे पोलीस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. अखेर या प्रकरणात लोकमतमध्ये वृत्त येताच पोलीस प्रशासनाने बैलगाडी शर्यत आयोजित करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेकदा नियम धाब्यावर बसवून बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. मात्र गाजावाजा झाला तरच पोलिसांकडून कारवाई केली जाते. उसाटणे गावातील व्हिडिओ सोमवारी सकाळपासून व्हायरल झाला असून त्यानंतरही पोलिसांकडे मात्र याबाबत कुठलीच माहिती नव्हती. शर्यतींवर बंदी असतानाही त्या आयोजित होतातच कशा आणि कुणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

५० हजार ते दोन लाखांपर्यंतची शर्यत  अंबरनाथ ग्रामीण भागांमध्ये लॉकडाऊन असतानादेखील अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. पोलिसांच्या भीतीपोटी अनेक शर्यती या सकाळी सात ते सकाळी दहाच्या दरम्यान घेण्यात येत आहेत. ५० हजार ते दोन लाखापर्यंतची शर्यत भरविण्यात येत असतात. प्रत्येक शर्यत ही चुरशीची होत असल्याने ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते.

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे