शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

डायलेसिसच्या केंद्रचालक संस्थेकडून ठाण्यात लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:33 PM

महासभेत गोंधळ : महापालिकेने स्वत: चालविण्याची मागणी

ठाणे : वार्षिक दोन लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना डायलेसिसची मोफत सुविधा देण्यासाठी संबंधित एजन्सीला ठाणे महापालिका प्रत्येक रु ग्णामागे एक हजार ४० रु पये अदा करत असली, तरी हे पैसे परत मिळावे, यासाठी संबंधित एजन्सीकडून शासनाकडे क्लेमच केला जात नसल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाली. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याने हे डायलेसिस सेंटर संबंधित एजन्सीकडून काढून एखाद्या सेवाभावी संस्थेला द्यावे किंवा पालिकेने स्वत: चालवावे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत केली आहे.

शहरात तीन ते चार टक्के रुग्णांना डायलेसिसची आवश्यकता असून या सर्वांना खाजगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. एका डायलेसिससाठी १८०० ते २००० पर्यंत खर्च असल्याने खाजगी रुग्णालयात डायलेसिस करणे सर्वसामान्यांना परवडत नव्हते. महापालिकेने ही गैरसोय दूर केली असून शहरात चार ठिकाणी सुरू केलेल्या डायलेसिस सेंटरमध्ये दोन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या रु ग्णांना ही सुविधा मोफत दिली आहे. मात्र, संबंधित एजन्सीकडून हा क्लेम केला जात नसल्याने ठाणे पालिकेचे अनेक वर्षांपासून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही कळवा रुग्णालयातील सेंटरचा मुद्दा उपस्थित करून सवलत देत नसताना त्यांचा ठेका का रद्द केला जात नाही, असा प्रश्न या सभेत केला.खासगी संस्था लाटते तिप्पट फायदाया डायलेसिस केंद्रांच्या माध्यमातून ज्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत आहे, त्या रुग्णांवर मोफत डायलेसिस उपचार करण्यात येणार आहेत. तर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख ते आठ लाख आहे, त्या रुग्णांसाठी ५२० रुपये फी आकारण्यात येणार आहे. तसेच ज्यांचा वार्षिक उत्पन्न गट आठ लाखांच्यावर आहे, त्या रुग्णांसाठी १०४० रुपये फी आकारण्यात येत आहे. ज्यांना मोफत सुविधा देण्यात येते, त्या प्रत्येक रु ग्णामागे ठाणे महापालिका संबंधित एजन्सीला एक हजार ४० रु पये अदा करते, तर या पैशांची परतफेड मिळावी, यासाठी संबंधित एजन्सीने शासनाच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत क्लेम करणे आवश्यक आहे.जो संबंधित एजन्सीकडून केला जात नसल्याने ठाणे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. क्लेम न केल्यामुळे पालिकेकडून मिळणारे पैसे तसेच एक ते आठ लाख उत्पन्न गटातील रुग्णांकडून ५२० रु पये आणि आठ लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यारु ग्णांकडून एक हजार ४० असा तिप्पट फायदाही संस्था घेते.यापूर्वी उघड झाला गैरप्रकारठाणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या डायलेसिसच्या रुग्णांना अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. दोन वर्र्षांपूर्वी आरोग्य विभागाकडून या डायलेसिस सेंटरसाठी पाठपुरावा केला होता. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या जागेत डायलेसिस सेंटर चालवण्यासाठी ज्या संस्थेला २५ वर्षे करार करून जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्या सेंटरमध्ये गरीब रु ग्णांना सवलत दिली जात नसल्याचा प्रकार यापूर्वी तत्कालीन महापौर संजय मोरे यांच्या कार्यकाळात उघड झाला होता. मोरे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेशदेखील दिले होते.शहरात चार केंद्रांत ४० बेडची सुविधाशहरात पाच ठिकाणी डायलेसिसची केंदे्र उभारण्यासाठी पालिकेचे प्रयत्न होते. मात्र, केवळ चारच ठिकाणी ही सेंटर सुरू केली आहेत. प्रत्येक केंद्रांवर १० डायलेसिस मशीन अशा चार केंद्रांवर ५० मशीन ठेवल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर १० बेड असे चार केंद्रांवर ४० बेड उपलब्ध करून दिले आहेत. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले होते.