शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

ठाणे जिल्ह्यातील ४९ गांवामधील २५२ हेक्टरवरील भेंडी, काकडी, मिरचीचे नुकसान

By सुरेश लोखंडे | Published: November 30, 2023 6:14 PM

भरपाईस अनुसरून शासनाकडेन सबंधीत शेतकऱ्यांची शिफारसही करण्यात आल्याचा दुजाेरा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी सांगितले.

ठाणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टानिर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात शनिवार, रविवार, साेमवार या तीन दिवसांच्या कालावधीत अवकाळी पाऊस पडला त्यामुळे ४९ गावांमधील २५१.८० हेक्टरवरील काकडी, मिरची , भेंडी भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून निश्चित झाले आहे. त्यांच्या भरपाईस अनुसरून शासनाकडेन सबंधीत शेतकऱ्यांची शिफारसही करण्यात आल्याचा दुजाेरा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी सांगितले.

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात शहरी व ग्रामीण भागात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेल्या पिकांचे व रब्बीच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने तत्काळ नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश जारी केले. त्यानुसार जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील एक हजार ७२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या या २५१.८० हेक्टर रब्बीचा भाजीपाला, मिरची, भेंडी, हरभरा, वाल आणि भाताच्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला आहे. त्यानुसार नुकसानीस पात्र असलेल्या या शेतकऱ्यांची शिफारस कृषी विभागाने विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे.

या पावसादरमयान वीटभट्टीच्या नुकसानीसह घरांवरील पत्र उडाल्याच्या घटनाही यावेळी घटल्या आहेत. त्यांच्या नाेंदी महसूल विभागानेही केल्या आहेत. शेतीच्या नुकसानीमध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये २५६ जणांचा समावेश आहे. त्यांच्या शेतातील ९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तूर, वाल,आंबा, मिरची,काकडी, भेंडी आदींचा समावेश आहे. या नुकसानीमध्ये शहापूर तालुक्यातील ३४ गावांमधील १९० शेतकऱ्यांचे ७२.२६ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. तर मुरबाड तालुक्यातील ७५ शेतकऱ्याच्या १९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे

या अवकाळी पावसामुळे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यामध्ये जिल्ह्याभरातील एक हजार ४६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील एक हजार ४०२ शेतकऱ्याचा समावेश आहे. त्यांच्या १५३.४८ हेक्टरवरील रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याखालाेखाल शहापूर तालुक्यातील ६० शेतकऱ्यांच्या सात हेक्टरवरील शेतीचे नुकसा झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस