शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

रखडलेली १७५ कोटींची देणी मिळवण्यासाठी मफतलालच्या कामगारांचा आता एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 19:19 IST

मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर यातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुला आहे. शेकडो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कष्ठाची व हक्काची रक्कम मिळण्याची आधा धरून असलेल्यां काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अजूनही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी दिलेली नाही.

ठळक मुद्देकळवा येथील मफतलाल कंपनी बंद होऊन ३० वर्षे लोटलीयातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुलासाडे तीन हजार कामगारांना अंदाजे १७५ कोटींची देणीअपेक्षित

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा येथील मफतलाल कंपनी मागील ३० वर्षापासून बंद पडली आहेत. यातील साडे तीन हजार कामगारांची सुमारे १७५ कोटींची देणी अद्यापही त्यांना मिळालेली नाही.आशा बाळगून असलेल्या एक हजार ५०० कामगारांचा मृत्यू झाला आहे. देशोधडीला लागलेला हा कामगार आता एल्गार लढा पुकारून आंदोलन तीव्र करण्याच्या प्रयत्नात आहे. याची रणनिती २६ मे रोजीच्या कामगार मेळाव्यात ऐरोली येथे आखली जाणार आहे.मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर यातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुला आहे. शेकडो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कष्ठाची व हक्काची रक्कम मिळण्याची आधा धरून असलेल्यां काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अजूनही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी दिलेली नाही. साडे तीन हजार कामगारांना अंदाजे १७५ कोटींची देणीअपेक्षित आहे. या रक्कमेसाठी कळवा येथे असलेली कंपनीची शेकडो एकर जमीन विकण्याचा घाट घातला आहे. तीन वेळा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमिनीचे एकरी सरकारी मूल्य ५ कोटी असताना ते ५० कोटी सांगितले जात आहे. यामुळे या जमिनीचा लिलाव तिन्ही वेळा होऊ शकला नाही. हेतुपुरस्सर जास्त रक्कम सांगितल्या जात असल्यामुळे विकासक ही जमीन घेण्यास धजावत नसल्याची खंत मफतलाल कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश पारख यांनी लोकमतला सांगितले.कामगारांना त्यांची हक्काची देणी मिळवून देण्यासाठी आता एल्गार लढा पुकारून आंदोलन तीव्र करण्यासाठी रविवारी होणाऱ्या कामगार मिळाव्यात आंदोलनाची दिशा व रणनिती सर्वांच्या साक्षिने ठरवण्यात येत असल्याचे पारख यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी कामगार नेते सुरेश म्हात्रे, कृष्णा भगत यांचेही नेतृत्व लाभले असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले. कंपनी बंद पडल्यापासून कामगार विखुरलेला आहे. पण आता त्यांना एकित्रत करून तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून येत्या रविवार ऐरोली येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.कळवा येथील मफतलाल कंपनी बंद होऊन ३० वर्षे लोटली आहेत. तरी देखील या हक्काच्या देणीपासून या कंपनीतील सुमारे तीन हजार कामगार आजपर्यंत वंचित आहेत. हक्काची रक्कम आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर असतानाचा काहींचा मृत्यूही झाला आहे. या मफतलाल कंपनीच्या शेकडो एकर भूखंडावर अनेकांचा डोळा असल्याने कंपनीच्या कामगारांमध्ये वारंवार फूट पाडून त्यांना एकत्र येऊ दिले जात नाही. पण आता हा लढ तीव्र करून कामगारांची देणी मिळेपर्यंत लढण्यात येणार आहे. नऊ वर्षानंतर प्रथमच हा कामगारांचा मेळावा घेऊन लढ्याची दिशा निश्चित करणार असल्याचे पारख यांनी सांगितले. या मेळाव्यास ५०० पेक्षा अधिक कामगारांची उपस्थिती असणार असल्याचे पारख यांनी सांगितले. हा मेळावा २६ मे रोजी सकाळी ११ वाजता ऐरोली येथील कुर्ग असोसिएशन हॉल, सेक्टर ३, येथील ऐरोली बस डेपोजवळ पार पडणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेkalwaकळवा