शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

आघाडीचे ठरता ठरेना, त्याच त्याच उमेदवारांवाचून पान हलेना! तिन्ही पक्षांचा भिवंडीवर दावा

By नितीन पंडित | Published: June 10, 2023 6:20 AM

युतीतील दोन्ही पक्षांचे बाळ्या मामांच्या भूमिकेकडे लक्ष

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : भिवंडीलोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. सलग दोन वेळा कपिल पाटील यांना मिळालेली खासदारकी आणि आता त्यांच्यामुळे ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेले स्थान यामुळे त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीला तेवढ्याच क्षमतेचा उमेदवार द्यावा लागणार आहे. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेत येथील उमेदवारीवरून चुरस असली, तरी दोन्ही पक्षांकडून त्याच त्याच नावांचा उल्लेख होत असल्याने आणि त्याबाबत आघाडीचे काहीही धोरण ठरत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आणि आता ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्या पाटील यांनी भिवंडी, भोवतालचा ग्रामीण भाग, त्याचबरोबर शहापूर, मुरबाडमधील राजकारणावर चांगलीच पकड घेतली आहे. रेल्वेचे प्रश्न मांडून दळणवळणावर लक्ष केंद्रित केले. 

त्याचवेळी पुण्यात नुकताच झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचा दावा करत त्यावर दावा केला. मात्र उमेदवार कोण हे एकाही नेत्याला सांगता आलेले नाही. भिवंडीवर दीर्घकाळ दावा सांगणाऱ्या काँग्रेसकडेही माजी खासदार सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांच्याशिवाय इतर उमेदवार नाहीत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्याशिवाय सध्या दुसरा चेहरा नाही. 

भिवंडी लोकसभेत भाजपला विशेषतः कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत टक्कर देणारा चेहरा म्हणून यापूर्वी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्याकडे पाहिले जात होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याशी तसा संपर्कही साधला होता. मात्र नंतर ते राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे पाटील यांच्यापुढील थेट आव्हान टळले. सध्या बाळ्या मामा यांनी थेट कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. मात्र त्यांनी तशी काही भूमिका घेतली, तर त्यातून राजकीय अडचण होऊ नये यासाठी युतीतील शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांचे त्यांच्याकडे लक्ष आहे.

या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन भाजपकडे, दोन शिवसेनेकडे, एक समाजवादी पक्षाकडे, तर एक राष्ट्रवादीकडे आहे. मात्र मुरबाडमधील भाजप आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातील राजकीय वाद कळीचा ठरतो आहे.

समाजवादी, बविआची  भूमिका महत्त्वाची 

- काँग्रेसची भिस्त समाजवादी पक्षाच्या मदतीवर आहे, तर समाजवादी पक्षाला स्वतःलाच या मतदारसंघात ताकद अजमावयाची आहे. 

- वसई-विरारचे राजकारण करता करता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने गेल्या वेळी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवाराला ५१ हजार मते मिळाली असली, तरी मतविभागणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

- कायमच सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणाऱ्या बविआची यावेळची राजकीय भूमिकाही या घडामोडींत कळीची ठरेल.

मतांचे गणित कसे ? 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांनी चार लाख ११ हजार ७० मते मिळवली. त्यांचे त्या वेळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना तीन लाख १ हजार ६२० मते मिळाली होती. २०१९च्या निवडणुकीत पाटील यांच्या मतांत वाढ होऊन ती पाच लाख २३ हजार ५८३ वर पोहोचली, तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना तीन लाख ६७ हजार २५४ मते मिळाली होती. भाजपची मते चार टक्क्यांनी तर काँग्रेसची मते दोन टक्क्यांनी वाढली होती.

 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीlok sabhaलोकसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा