शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

Maharashtra Election 2019: घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 1:46 AM

Maharashtra Election 2019: समस्यांच्या नावाने बोंबाबोंब, मतदानालाही ठेंगा

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील विविध नागरी समस्यांप्रकरणी स्थानिक नागरिकांची नेहमीच ओरड राहिली आहे. परंतु, मतदानाचा हक्क बजावून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची मानसिकता मतदारांची नाही. हे मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बंडखोरी झालेल्या या मतदारसंघात घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाच्या मुळावर उठते, हे चित्र गुरुवारी मतमोजणीतून समोर येईल.

कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात आहेत. गणपत गायकवाड (भाजप), प्रकाश तरे (राष्ट्रवादी काँग्रेस), मिलिंद बेळमकर (बहुजन समाज पार्टी), अश्विनी थोरात-धुमाळ (वंचित बहुजन आघाडी) सचिन चिकणे (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक) अभिजीत त्रिभुवन (बहुजन मुक्ती पार्टी), उदय रसाळ (प्रहार जनशक्ती पक्ष), हरिश्चंद्र पाटील (संघर्ष सेना) यांच्यासह ११ अपक्ष उमेदवार येथे आहेत. यात शिवसेनेचे धनंजय बोडारे आणि काँग्रेसचे शैलेश तिवारी हे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

कल्याण पूर्वेतील समस्या नेहमीच चर्चेत असतात. तलावांची दूरवस्था, डम्पिंग नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिग, पावसाळ्यात तुंबणारी गटारे, ड्रेनेजचा अभाव, नादुरुस्त आणि अरुंद रस्ते, अतिक्रमण, बेकायदा बांधकामे, धोकादायक इमारतींचा प्रश्न, सरकारी रुग्णालयाची वानवा, उद्यान आणि मैदानांची कमतरता, पाणीसमस्या, विरंगुळा केंद्र नसणे, विकासकामांमुळे बाधित होणाºया रहिवाशांच्या पुनर्वसनाची बोंब, यामुळे येथील नागरिक त्रासलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारातही हे मुद्दे अग्रस्थानी राहिले. त्याचबरोबर आरक्षणाच्या जागा बळकावण्यासह बेकायदा बांधकाम आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उमेदवारांकडून झाडल्या गेल्याचेही दिसून आले.

पूर्व मतदासंघात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, रिपाइंचे रामदास आठवले, भाजपचे मनोज तिवारी, श्वेता शालिनी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा झाली. एवढेच नव्हे तर प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मतदारसंघात पायधुळ झाडली आहे. यासर्वच नेत्यांनी मतदारांना भरघोस मतदान करा, असे आवाहन केले होते. निवडणूक आयोगानेही मतदान जागृतीचे कार्यक्रम राबवून मतदान करा, अशी हाक दिली होती.

मात्र, समस्यांच्या मुद्यावर याठिकाणी भरघोस मतदान करून मतदार आपल्यातील संताप व्यक्त करतील, असा दावा जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. परंतु, मतदारांनी पाठ दाखवून तो फोल ठरविला आहे. याठिकाणी तीन लाख ४५ हजार ६६६ एकूण मतदार आहेत. यापैकी केवळ एक लाख ५० हजार ५३५ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, एक लाख ९५ हजार १३१ मतदारांनी मात्र मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाची मतदानाची टक्केवारी ४३.५५ इतकी मर्यादित राहिली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तीन लाख १२ हजार ५४४ मतदार होते. त्यावेळी एक लाख ४१ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतांची टक्केवारी ४५.१९ इतकी होती. परंतु, यंदा मतदारांची संख्या वाढूनही मतदान वाढलेले नाही. ४३.५५ टक्के मतदान झाले असून दीड टक्क्याच्या आसपास टक्केवारी घसरली आहे.

मतदारांनी फिरवलेली पाठ लोकशाहीसाठी मारक

पूर्वेतील मतदार विविध नागरी समस्यांमुळे पिचलेला आहे. केडीएमसी असो अथवा केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता असतानाही कोणतीही विकासाची कामे पूर्वेत झालेली नाहीत. त्यामुळे नाराजीतून मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. त्यात एकीकडे महागाई, खड्ड्यांमुळे नागरिक त्रासले असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा प्रचाराचा मुद्दा काश्मीर ३७० कलम रद्द करणे, असो अथवा दहशतवाद, यासारख्या विषयाभोवतीच आवर्जून राहिला. यामुळे मतदार नाराज झाले आणि त्याचे चित्र मतदानाच्या टक्केवारीतून दिसून आले.- जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादी आमदार, विधानपरिषद

नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावलेच पाहिजे. लोकांचा मतदानाबाबत असलेला निरुत्साह दूर झाला पाहिजे. जर मतदानच केले नाही तर निरुत्साह कसा दूर होईल. प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय पक्षांकडून नेहमीच मतदान करा, असे आवाहन केले जाते. परंतु, मतदार त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लोकशाहीसाठी मारक आहे.- गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाध्यक्ष, शिवसेना

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान