शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

मंडईची वास्तू पडूनच; रहिवाशांना घ्यावी लागते डोंबिवलीत धाव

By admin | Published: August 21, 2015 2:17 AM

वाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीवाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. केडीएमसी क्षेत्रातील एकमेव असा ९० फुटी रस्ता ही नव्याने ओळख असलेला हा वॉर्ड तुलनेने मोठाही आहे. नियोजनबद्ध इमारती-रस्ते या ठिकाणी तयार होत असतानाच मूलभूत गरजांसाठी मात्र या ठिकाणच्या नागरिकांना डोंबिवलीवरच अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे भाजी मंडईची प्रशस्त जागा असूनही केवळ महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे ती सुविधा मिळत नसल्याने महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होते.येथील मंगलकलश सोसायटीमध्ये मंडईसाठी महापालिकेची सुमारे १५०० स्क्वे. फूट ग्राउंड प्लस वन सुसज्ज जागा आहे. तेथे इमारतीचे काम पूर्ण झाले, नागरिक वास्तव्याला गेले, पाठोपाठ परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यात २४ तास पाण्याची सुविधा, डांबरीकरणाचे चांगले रस्ते आदी असले तरीही भाजी, मच्छी, किराणा या जीवनावश्यक बाबींसाठी नागरिकांना अद्यापही डोंबिवली अथवा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात १.५ ते २ किमी जावे लागते. वॉर्डाचा बहुतांशी भाग हा एमआयडीसी क्षेत्रालगत असल्याने प्रदूषणाचीही समस्या आहेच. अनेकदा संध्याकाळच्या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणे नकोसे होते, तशा अवस्थेत वर्षानुवर्षे लोक येथे राहतात. खंबाळपाड्यातच परिवहनचा मोठा भूखंड आहे, मात्र तेथेही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बसेस उभ्या राहण्याऐवजी कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहतात. असे असूनही या ठिकाणची कचरा निर्मूलनाची समस्या आहेच. लाखाच्या घरात असलेल्या वस्तीसाठी अवघे ६ सफाई कर्मचारी, तेही पूर्णपणे येत नाहीत. या ठिकाणी तीन स्मशानभूमी असून एक स्मशानभूमी अद्ययावत आहे, तर अन्य एका ठिकाणी २९ लाख खर्चून शोकसभागृह व १४ लाखांच्या लाद्या बसवण्यात येणार आहेत. सध्या तरी त्या ठिकाणी प्रचंड गैरसोय असून तो गर्दुले व तळीरामांचा अड्डा बनला आहे. तिसरी रस्त्यालगत असून त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कृत्रिम तलाव असून या ठिकाणी बहुतांशी सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते.परिवहन सेवेचा लाभही येथील नागरिकांना मिळत नाही. येथूनच हाकेच्या अंतरावर पेंढरकर महाविद्यालय, मंजूनाथ कनिष्ठ महा., सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर, क्रीडा संकुल, डोंबिवलीकरांचे भूषण असलेल्या कॅ. विनयकुमार सच्चान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेला शौर्यगाथा सांगणारा ‘रणगाडा’, घरडा सर्कलचे फाउंटन आदी महत्त्वाची, विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, रात्री-अपरात्री नाटक सुटल्यावर बसची सुविधा नसल्याने रिक्षा, टॅक्सी वाहने शोधताना नागरिकांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे खंबाळ पाड्यातून ठाकुर्ली - डोंबिवलीसाठी मध्यरात्रीपर्यंत परिवहनची सुविधा असणे आवश्यक आहे.