शहरं
Join us  
Trending Stories
1
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
2
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
3
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
4
मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...
5
"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
6
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
7
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
8
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Hero, HCL मध्ये तेजी, टायटन, अदानी पोर्ट्स घसरले
9
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
10
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?
11
ढोल-ताशांचा नाद, पतीचा डान्स अन् शेजाऱ्यांनी काढली दृष्ट, जान्हवी किल्लेकरचं ग्रँड फिनालेनंतर जंगी स्वागत
12
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
13
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
14
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
15
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
16
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
17
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
18
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
19
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
20
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत

भिवंडी शहर विकास आराखड्यात अनेक त्रुटी; आमदार रईस शेख यांचा आरोप

By नितीन पंडित | Published: November 02, 2023 6:13 PM

नव्या विकास आराखड्याप्रमाणे शहर विकासकामांसाठीची निधी कुठून आणनार असा सवाल देखील आमदार शेख यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

भिवंडी : भिवंडी शहराचा विकास आराखडा मनपा आयुक्तांनी मागील महिन्यात जाहीर केला आहे, मात्र  हा विकास आराखडा बनवताना भिवंडीकरांसह विस्थापित नागरिकांचा विचार केला गेला नसून आराखड्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केला आहे गुरुवारी आमदार शेख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे. विकास आराखड्यामध्ये बाधितांच्या पुनर्वसनासाठी पालिका प्रशासनाकडे कोणतीही योजना नसल्याने मागील वीस वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा देखील रखडला असून या आराखड्याप्रमाणे केवळ पाच टक्केच काम झाले हे शहराचे दुर्दैव असून आर्थिक डबघाईला आलेल्या मनपा प्रशासनाकडे नव्या विकास आराखड्याप्रमाणे शहर विकासकामांसाठीची निधी कुठून आणनार असा सवाल देखील आमदार शेख यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या घरांना व जमीन मालकांना बाजार भावा प्रमाणे मोबदला देणे बंधनकारक असतानाही भिवंडी मनपाकडून त्याबाबत कोणतेही आश्वासन अथवा घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्याचबरोबर या आराखड्यातील आरक्षणामध्ये देखील अनेक त्रुटी असून,जिथे रस्त्यांची गरज नाही अशा ठिकाणी रस्ते दर्शविण्यात आले असून, जेथे रस्त्यांची गरज आहे अशा रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार शेख यांनी केला आहे.       

शहर विकास आराखडा जाहीर झाल्यापासून अनेक दलालांनी नागरिकांकडे धावा घेतला आहे, मात्र नागरिकांनी कोणत्याही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये त्यासाठी नागरिकांना काही अडचणी अथवा प्रश्न असल्यास थेट मनपा प्रशासनाशी अथवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी आमदार शेख यांनी केले असून शहरातील बाधितांना केवळ टीडीआर नको तर बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा तसेच वन विभागाच्या जागेवर असलेल्या घरांना देखील मोबदला देण्यात यावा व विकास आराखड्याबाबत आक्षेप घेण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आमदार शेख यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी