शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव! गोदामाला लागलेल्या आगीत पाच गोदाम जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:36 PM

Bhiwandi fire News : टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ही गोदामे भली मोठी असल्याने आतमध्ये जाऊन आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडीतआग लागण्याचे सत्र सुरूच असून तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील स्वराज्य कंपाऊंड मधील तयार कपडे, प्लास्टिक पाईप, कागदी पुठ्ठा साठविलेल्या गोदामास भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या आगीत पाच गोदामे जळून खाक झाली आहेत. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तब्बल दहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. 

या आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशामक दलाच्या प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी दाखल असून खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ही गोदामे भली मोठी असल्याने आतमध्ये जाऊन आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यातच गोदामातून मोठया प्रमाणावर धूर निघत असल्याने त्याचाही त्रास होत होता. अखेर दहा तासांनी आग आटोक्यात आली असून या आगीने नेमकी कारण अजून समजू शकले नाही. सुदैवाने आग पहाटे लागल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग