शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदावरून रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:02 IST

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात आहेत. तर निवडणूक काळात अन्य भागातून बदली होऊन आलेले आयुक्तालयातील १५ पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि काही सेकंड पीआय अश्या सुमारे १९ निरीक्षकांनी त्यांच्या कडील नुकताच दिलेला पोलीस ठाणे प्रभारीचा पदभार काढून घेण्याचा अन्याय होऊ नये म्हणून मॅट मध्ये धाव घेतली आहे.  त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. 

पोलीस आयुक्तालयात ३ वर्षां पेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर विलंबाने परंतु आचार संहिता सुरु झाल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या. मुंबई आदी भागातून बदली होऊन आलेल्या ३६ पोलीस निरीक्षकांच्या ४ नोव्हेम्बर रोजी मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे आदी ठिकाणी नियुक्त्या केल्या गेल्या. 

 मिभा - ववी आयुक्तालयातून बदली झाल्याने अनेक नाराज अधिकारी यांनी मॅट मध्ये धाव घेतली. त्यावर सुनावणीची १४ जानेवारी रोजीची तारीख आहे. दरम्यान  पोलीस महासंचालक कार्यालयाने ३१ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षकांच्या बदली आदेशाने  मिभा - ववी आयुक्तालयातून निवडणूक काळात बदली होऊन गेलेल्या  संजय हजारे, जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत सरोदे, विलास सुपे, दिलीप राख व सुधीर गवळी ह्या ७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पुन्हा घरवापसी केली. 

घरवापसी केल्यानंतर ते अधिकारी ९ जानेवारी रोजी  मिभा - ववी आयुक्तालयात हजर झाले आहेत . त्या पोलीस अधिकाऱ्यांना ते आधी कार्यरत असलेली पोलीस ठाणी मिळण्याची आशा आहे. कारण त्यांची झालेली बदली ही अन्यायकारक होती असा त्यांचा दावा आहे. 

परंतु मुंबई आदी भागातून विधानसभा निवडणुकीत आलेले पोलीस निरीक्षक यांनी देखील त्यांना पोलीस ठाणे प्रभारी म्हणून असलेली जबाबदारी काढून घेऊन अन्याय करू नये म्हणून मॅट मध्ये दाद मागितली आहे. निवडणूक काळात शासनाचा आदेश मानून आम्ही कुठेही तक्रार न करता नेमणूक दिलेल्या जागी हजर झालो. आता नियुक्ती होऊन केवळ २ महिने होत नाहीत तोच पुन्हा प्रभारी पदावरून काढण्याची आणि परतलेल्या जुन्या अधिकाऱ्यांना नेमण्याची चर्चा त्यांच्यात आहे. 

एकूणच पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ वरिष्ठ निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात असतानाच २ महिन्यां पासून पोलीस ठाणे प्रभारी पदावर कार्यरत पोलीस निरीक्षकांनी देखील मॅट मध्ये धाव घेतल्याने पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यां मध्येच सामना रंगला आहे. पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे सह पोलीस आस्थापना मंडळ हे  योग्य आणि नियमानुसार निर्णय घेऊन विभागातील पोलीस अधिकाऱ्यांना खरंच न्याय कसा देणार? कि कोणावर अन्याय करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस