शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

मीरा भाईंदर काँग्रेसचे 'हाथ से हाथ जोडो' अभियान सुरू; २४ चौकसभा, पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद

By धीरज परब | Published: March 20, 2023 6:00 PM

शहरात २४ चौकसभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भाजपा सरकारचे अपयश मांडले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर काँग्रेसच्या वतीने शहरात हाथ से हाथ जोडो अभियान सुरु करण्यात आले आहे. शहरात २४ चौकसभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भाजपा सरकारचे अपयश मांडले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले आहे. 

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पार पडल्यानंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार तथा माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉक मध्ये २ ते ३  पदयात्रा काढण्यात येत आहेत. भाजपच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल २४ चौकसभा घेऊन केली जात आहे. सदर अभियान दोन महिने चालणार असल्याचेच सामंत म्हणाले. 

उत्तन, भाईंदर पश्चिम व पूर्व, नया नगर, शांती नगर, हटकेश, मीरा रोड, काशीमिरा आदी ८ ब्लॉक मधील विविध भागात २४ प्रचार फेरी व चौकसभा घेऊन काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक पायी फिरून पत्रके वाटून जनतेशी थेट संवाद साधला. गेल्या ८ वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे असा आरोप सामंत यांनी केला. 

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, महिला आदींसह सर्व घटक भाजपच्या कारभारावर नाराज असल्याने काँग्रेसने राज्यपातळीवर हाथ से हाथ जोडो अभियान सुरु केले आहे. भाजप दोन उद्योगपतींसाठी देश चालवित असून गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप प्रदेश सरचिटणीस भावना जैन यांनी केला. यावेळी सरचिटणीस आनंद सिंह, माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन सह माजी नगरसेविका गीता परदेशी, रुबिना शेख, महिला अध्यक्ष रूप पिंटो, वेलेरिन पांडरीक, प्रवक्ते प्रकाश नागणे सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारण