शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

मीरा-भाईंदरमध्ये गटारांच्या पाण्यावर पालेभाजीचे मळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 11:02 PM

महापालिका, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांच्या शेजारी सर्रास पालेभाज्यांचे मळे फुलवले जात आहेत. गटारांच्या दूषित पाण्यावर पिकवलेली ही भाजी खुल्या बाजारात विकली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या प्रकाराला वेळीच आवर न घातल्यास शहरातील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त, नवघर, भाईंदर, नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज देण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिमेला रेल्वेमार्गालगत आणि मीरा रोड आणि भाईंदर पश्चिमदरम्यान असलेल्या खाडीलगत भाजीपाला लागवड केली जात आहे. शहराचे सांडपाणी या नाला-खाडीतून जात असून याच पाण्यात पाइप टाकून पंपाने पाणी खेचून ते पालेभाज्या पिकवण्यासाठी वापरले जात आहे. भार्इंदर पूर्व ते मीरा रोड पूर्व या रेल्वेमार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत गटारांच्या पाण्यावर भाजीपाला लावला जात आहे. मीरा रोड पश्चिमेस जाफरी खाडीलगत सांडपाण्यावरच पालेभाज्या लावल्या जात आहेत.

भाईंदर पूर्वेच्या नवघर येथेही शंकर नारायण महाविद्यालयाच्या ताब्यातील मैदान भागात भाजीपाला लागवड केली जात आहे. या नाले व खाडीत शहराचे मलमूत्र, सांडपाणी सोडले जात असून हे पाणी अत्यंत प्रदूषित व दुर्गंधीयुक्त आहे. मानवी आरोग्यास हे प्रदूषित सांडपाणी घातक आहे. त्याचा वापर हा सर्रास पालेभाज्या आणि भाज्या पिकवण्यासह त्या धुण्यासाठी केला जात आहे. या भाज्यांची बाजारात खुलेआम विक्री केली जात आहे. मलमूत्र-सांडपाण्यावर पिकवल्या गेलेल्या या भाज्या खाऊन नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे.

...तर हे भाजीपाल्याचे मळे आम्हीच उद्ध्वस्त करू!

सांडपाण्यावर भाज्या पिकवणाऱ्यांविरोधात महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे. त्यांचे पंप, पाइप आदी साहित्य जप्त करावे. हे भाजीचे मळे उद्ध्वस्त करावे, अशी मागणी पेंडुरकर यांनी केली आहे. पालिका आणि पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गटारांच्या घातक पाण्यावर पिकणारे हे भाज्यांचे मळे आम्ही उद्ध्वस्त करू, असा इशारा पेंडुरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरMaharashtraमहाराष्ट्र