शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

संमेलन कंपूशाहीला छेद देणारे असावे

By admin | Published: October 12, 2016 4:07 AM

मराठी साहित्य विश्वातही कंपूशाही आहे. साहित्य संमेलनाच्या दरबारी खऱ्या साहित्यिकांना डावलले जाते. ते पुढे येत नाही. डोंबिवलीतील साहित्य संमेलन हे

डोंबिवली : मराठी साहित्य विश्वातही कंपूशाही आहे. साहित्य संमेलनाच्या दरबारी खऱ्या साहित्यिकांना डावलले जाते. ते पुढे येत नाही. डोंबिवलीतील साहित्य संमेलन हे साहित्यातील कंपूशाहीला छेद देणारे व्हावे. त्याचे आयोजन हे एक आदर्श ठरावे, अशी अपेक्षा डोंबिवलीतील ज्येष्ठ साहित्यिका लीला शहा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. शहा पुढे म्हणाल्या की, ‘खऱ्या साहित्यिकांना या संमेलनात स्थान मिळाले पाहिजे. भव्य आणि दिव्य आयोजनात खऱ्या साहित्यिकाची उपेक्षा होते. त्याला फारसे स्थान दिले जात नाही. काही प्रसंगी तर त्याला साधे कळविण्याची तसदीही घेतली जात नाही. संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी खऱ्या साहित्यिकांना विचारात घ्यावे. त्यांना संमेलनाविषयी काय वाटते, त्यात काय असावे आणि काय असू नये, याचा विचार घ्यावा. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर कमी असावा,’ अशीही सूचना शहा यांनी केली आहे.शहा या डोंबिवलीत ३० वर्षांपासून राहत आहेत. आतापर्यंत विविध विषयांवरील त्यांची ५६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राज्य सरकारचा उत्कृ ष्ट वाङ्मयाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच ‘आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शहा म्हणाल्या की, अनेक लेखक प्रकाशकांना पैसे देऊन पुस्तके छापतात. मात्र मी कसे कधीच केले नाही. प्रकाशक माझ्याकडे स्वत:हून आले. मानधन देऊन माझे लेखन प्रकाशित केले. मात्र, डोंबिवलीतील काव्य रसिक मंडळाने माझ्या काव्य लेखनाची दखल घेतलेली नाही. माध्यमांनी शहरातील अनेक साहित्यिकांची दखल घेतली आहे. मात्र, माझ्या कामाची दखल घेतली नाही,’ अशी खंत शहा यांनी व्यक्त केली. ५० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शहा सहभागी झाल्या होत्या. तेथेही त्यांची दखल घेतली गेली नाही. मात्र कार्यक्रम संपल्यावर दखल न घेतल्याची जाणीव झाल्याचे आयोजकांनी बोलून दाखविल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीतील संमेलनात स्थानिक साहित्यिकांची दखल घेतली जावी. त्यांना संमेलनात योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली आहे.