शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सहा महिन्यांत फुटणार मेट्रोचा नारळ

By admin | Published: March 05, 2016 3:45 AM

गेल्या कित्येक वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत असलेल्या वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोचा नारळ अखेर सहा महिन्यांच्या आत, तोही ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी फोडण्याचा निर्धार झाला आहे

ठाणे : गेल्या कित्येक वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत असलेल्या वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोचा नारळ अखेर सहा महिन्यांच्या आत, तोही ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी फोडण्याचा निर्धार झाला आहे. परंतु, आता मेट्रोच्या आराखड्यात काही बदल सुचवले असून, सुरुवातीला ठाण्यातील मेट्रो भुयारी मार्गातून जाईल, असे निश्चित केले होते. मात्र, आता ती एलिव्हेटेड करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन महिन्यांत आराखडा अंतिम होऊन पुढील कामास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून क्लस्टरपाठोपाठ मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये मात्र कलगीतुरा रंगणार असल्याचे चित्र यानिमित्ताने निर्माण झाले आहे.वडाळा ते घोडबंदर-कासारवडवली या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला २०१४ मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु, याचा खर्च अधिक असल्याने या मुद्यावरून या प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच एमएमआरडीएच्या येत्या अंदाजपत्रकातही या योजनेसाठी तरतूद केली जाणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. ठाण्यातील मेट्रोच्या या कामासाठी सुमारे २०९१ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. तर, ३२ किमीच्या या मार्गामध्ये ३० स्थानके असणार आहेत. ठाण्यातील १३ स्थानकेदेखील भुयारीच असतील, असे सुरुवातीला स्पष्ट झाले होते. आता ठाण्यातील सर्व स्थानके उन्नत असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्लस्टरला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर श्रेय घेण्यासाठी ठाण्यात सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनरयुद्ध रंगले आहे. आता येत्या सहा महिन्यांत मेट्रोचा नारळ फोडून भाजपाने या कामाचे श्रेय घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. > उन्नत स्थानकेएलबीएस-मुलुंडमार्गे ठाण्यातील तीनहातनाका ते ओवळा कारशेडपर्यंत १३ स्थानके प्रस्तावित असून यामध्ये तीनहातनाका, आरटीओ, वागळे, कॅडबरी, गोल्डन डाइज, कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, टिकुजिनीवाडी, आनंदनगर, वाघबीळ, कासारवडवली आणि ओवळा (कारशेड) अशी स्थानके त्यांनी दर्शवली आहेत. त्यानुसार, ही स्थानके उन्नत असणार आहेत.