शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

रोजगाराअभावी जव्हारमध्ये स्थलांतर

By admin | Published: March 14, 2016 1:34 AM

जव्हार तालुक्यामध्ये पावसाळी हंगामी कामे संपल्यानंतर येथील मजुरांच्या हाताला कोणतेही काम नसते. या ग्रामीण भागात कंपन्या व औद्योगिक क्षेत्र नसल्याने येथील बेरोजगार मजुरांना कोणतेही काम मिळत नाही

जव्हार : जव्हार तालुक्यामध्ये पावसाळी हंगामी कामे संपल्यानंतर येथील मजुरांच्या हाताला कोणतेही काम नसते. या ग्रामीण भागात कंपन्या व औद्योगिक क्षेत्र नसल्याने येथील बेरोजगार मजुरांना कोणतेही काम मिळत नाही. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे. जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हाडे गावठाण, देवीचापाडा, धूमपाडा व गणेशनगर या गावपाड्यांतील जॉबकार्डधारकांनी तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोहयो कामाची मागणी करूनही काम मिळाले नाही. कासटवाडी ग्रामपंचायतीमध्ये ५९६ जॉबकार्डधारक कुटुंबांची संख्या असून यामध्ये १ हजार ७७८ रोहयो मजूर आहेत. या मजुरांनी जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तीन महिन्यांपूर्वी जव्हार तहसीलदार रोहयो विभागाकडे ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या मागणीचा अर्ज केला होता. मात्र, अजूनही काम उपलब्ध करून देण्यास यंत्रणा निकामी ठरली आहे. रोजगार हमीच्या कामांची मागणी मजुरांनी केल्यानंतर संबंधित कामावर लागणाऱ्या मजुरांचे ई-मस्टर काढून त्यांना १५ दिवसांच्या आत काम देणे बंधनकारक असते. परंतु, जव्हार तहसीलदार व त्यांची रोजगार हमी यंत्रणा यांच्या बेजबाबदारपणामुळे कासटवाडी गावातील मजुरांना काम मिळाले नाही. परिणामी, येथील रोहयो मजुरांना ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, रेतीबंदर, वीटभट्टी, बांधकाम अशी बिगारी कामे करण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे.