शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

उल्हासनगर महापालिकेकडे लाखोंची प्रलंबित बिले; स्मशानभूमी ट्रस्टीला मोफत लाकडे देण्यास निरुत्साह?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:59 PM

उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू नागरिकांना आपल्या नातेवाईकवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता यावे म्हणून मोफत लाकडे देण्याचा निर्णय घेतला.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेकडे लाकडाचे बिले गेल्या ४ महिन्यापासून प्रलंबित असल्याने, स्मशानभूमी ट्रस्टी गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत लाकडे देण्यास निरुत्साही आहेत. लाकडाचे नियमित पैसे देत नसल्याने, मोफत लाकडे कसे देणार? असा प्रश्न स्मशानभूमी ट्रस्टी मेघराज लुंड यांनी महापालिकेला केला. 

उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू नागरिकांना आपल्या नातेवाईकवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता यावे म्हणून मोफत लाकडे देण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत झाले. सन २०१४ साली एका अंत्यसंस्काराच्या लाकडा पोटी पालिका १ हजार रुपये देते. हा जुनाच दर आजही कायम असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी स्मशानभूमी ट्रस्टीने महापालिकेकडे केल्याची माहिती शांतीनगर स्मशानभूमीचे ट्रस्टी मेघराज लुंड यांनी दिली.

एका अंत्यसंस्कार मागे ट्रस्टीला एकूण १७०० ते १८०० रुपये खर्च येतो. तर महापालिका फक्त लाकडाचा १ हजार रुपये खर्च देते. ट्रस्टी मृत नातेवाईकांकडून अगदी अल्प फी आकारत असून पाणी बिल, वीज बिल, माळीचा खर्च, अंत्यसंस्कार करणार्यांचा पगार आदी खर्च ट्रस्टीला करावा लागत असल्याचे ट्रस्टीने म्हणणे आहे.

महापालिकेच्या मोफत लाकडे पुरविण्याच्या निर्णयाचा ७० टक्के नागरिक फायदा घेत आहेत. शहरात ४ प्रमुख हिंदू स्मशानभूमी असून सरासरी दरमहा ३५० ते ४०० मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असल्याचे लुंड यांनी सांगितले. त्यापैकी ७० टक्के नागरिक मोफत लाकडाचा लाभ घेत आहेत. गेल्या ४ महिन्या पासूनचे मोफत लाकडाचे बिल प्रलंबित असून मोफत लाकडे द्यावी की नाही? असा प्रश्न पडल्याचेही लुंड म्हणाले. २९ जानेवारीला स्मशानभूमी ट्रस्टीने आमदार कुमार आयलानी यांच्या सोबत प्रलंबित बिला बाबत चर्चा केली. तसेच महापालिकेला प्रलंबित बिले काढण्याची मागणी केल्यावर त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लुंड म्हणाले. याबाबत महापालिकेचे उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे संपर्क केला असता, झाला नाही. 

ट्रस्टीच्या विरोधात सामान्य नागरिकांत नाराजी

महापालिका नियमित मोफत लाकडाचे बिल गेल्या ४ महिन्या पासून देत नसल्याने, स्मशानभूमी ट्रस्टी गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत लाकडे देण्यास निरुत्साह दाखवीत आहेत. याप्रकाराने सर्व सामान्य नागरिकांनी ट्रस्टी विरोधात नाराजी व्यक्त केली. प्रलंबित बिले आज ना उद्या मिळणार असल्याने, ट्रस्टीने मोफत लाकडे देण्याचे बंद करू नये. असे मतही सोशल मीडिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर