शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

भोंगापतींमुळे हिंदू भाविकांचे सर्वात मोठे नुकसान झाले; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 3:56 PM

मीरा रोड : गेल्या काही दिवसांत भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून ...

मीरा रोड : गेल्या काही दिवसांत भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून टाकला. मराठीत उचापती म्हणतात तसेच हे भोंगापती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली; परंतु या भोंगपतींमुळे सर्वात मोठे नुकसान हिंदू भाविकांचे झाल्याचे ते म्हणाले.

मीरा रोडच्या मेडतीया मैदानात रविवारी आयोजित पक्षाच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते. कोरोनाकाळात कोणी उपचार केले, कोणी रक्त दिले, कोणी सेवा केली माहिती नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर प्रेताच्या जवळ जायला लोक घाबरायचे. त्यावेळी मृतदेह कोणी उचलले व अंत्यविधी कोणी केले, त्यांचे धर्म कोणते याचा विचार त्यावेळी कोणी केला नाही. केवळ माणुसकी दिसत होती; पण कोरोना गेला आणि नेत्यांना पुन्हा धर्म-जात आठवायला सुरुवात झाली, असे आव्हाड म्हणाले. यावेळी प्रदेश सचिव मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, साजिद पटेल, अनु पाटील आदी उपस्थित होते.

कर्ण्यावरून होणारी आरती झाली बंद

भोंगा या विषयामुळे सर्वात मोठी अडचण श्रद्धाळू हिंदूंची झाली. कारण शिर्डीची शेजारती- काकड आरती कर्ण्यावरून व्हायची बंद झाली. पंढरपूरची विठ्ठल-रखुमाईची, तुळजापूरची आरती तशीच बंद झाली. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उभे राहून कर्ण्यावरून ऐकू येणारी आरती भाविक करायचे. मुस्लिमांनी निर्णय घेत दीड मिनिटांची अजान भोंग्यावरून बंद केली, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. स्वतःच खणलेल्या खड्ड्यात माणूस कसा पडतो त्याचे उद्दाम उदाहरण भोंगापती आहे, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे