शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

दहा महिने होऊनही मिनीट्रेन बंदच...

By admin | Published: February 16, 2017 2:07 AM

माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन तांत्रिक अडचणीचे कारण देत रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी बंद केली, आज याला दहा महिने होत

मुकुंद रांजणे / माथेरानमाथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन तांत्रिक अडचणीचे कारण देत रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी बंद केली, आज याला दहा महिने होत आलेत. मागील वर्षी ८ मेला रेल्वे घसरल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. तेव्हा रेल्वे सेवा पूर्ववत व्हावी यासाठी माथेरानकरांनी मोठे आंदोलन केले. मात्र ऐन पर्यटन हंगामामध्ये रेल्वे सेवा बंद झाली. पर्यटकांपर्यंत ही बाब जाण्यास उशीर झाला त्यामुळे मागील वर्षी पर्यटनावर त्याचा फार मोठा परिणाम दिसून आला नाही. जसजसा काळ पुढे चालला आहे तसतसा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. माथेरान हे प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील डोंगर रांगांमध्ये नागमोडी वळणे घेणाऱ्या मिनीट्रेनचे फार मोठे आकर्षण आहे. आपल्या शालेय जीवनात घेतलेला मिनीट्रेनचा थरारक अनुभव आपल्या बच्चे कंपनीनेही घ्यावा अशी येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते, त्यामुळे येथील मिनीट्रेनमुळे माथेरानच्या पर्यटन व्यवसायास भरभराट आली होती. मात्र रेल्वे प्रशासन तोट्यात चालणारी सेवा म्हणून कायम या मार्गाला दुर्लक्षित करीत राहिले. यामुळेच येथील मार्गावर चालणारी इंजिने व बोगी डबघाईला आली त्याचा परिणाम येथील सेवेवर होऊन गाडी बंद पाडण्याचे प्रमाण वाढू लागले. इंजिनाची क्षमता नसतानाही त्यांना गाड्यांना जोडून प्रवास सुरू होता. हे सत्र जवळजवळ दोन वर्षे सुरु होते, या काळात कोणतेही नवीन इंजिन माथेरानच्या ताफ्यात समाविष्ट केले गेले नाही, त्यामुळे इंजिनाची क्षमता संपून गाडी घसरण्याच्या प्रमाणात वाढ झाली. वॉटरपाइप स्टेशन ते माथेरान दरम्यानच्या मार्गावर अजूनही खूप कामे बाकी आहेत. मधल्या भागातील काही रेल्वे रूळसुध्दा जमिनीखाली बुजले गेले आहेत. अमनलॉज ते माथेरान हे रूळ काढून त्याचा फक्त सांगाडाच शिल्लक ठेवलेला आहे. माथेरान स्थानक मोकाट गुरांचा अड्डाच बनलेला आहे. सर्वत्र धूळ व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळेच माथेरानची मिनीट्रेन लवकरच सुरू करणार या रेल्वे प्रशासनाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याची विचारणा स्थानिकांकडून होत आहे. रेल्वेने चाचणी सुरू केल्याचा देखावा देखील केलेला आहे. अपघात क्षेत्र माथेरानमध्ये आणि चाचणी नेरळमध्ये असा विरोधाभास सुरू आहे. पावसाळ्यात डागडुगीसाठी मिनीट्रेन दरवर्षी बंद असते, मात्र यावर्षी आधीच बंद होऊनदेखील डागडुगी मात्र बंदच होती. त्यामुळेच या हंगामामध्ये तरी ही सेवा सुरू होणार का असा प्रश्न माथेरानकरांना पडला आहे. जर या हंगामापूर्वी रेल्वे सुरू झाली नाही तर त्याचा फटका येथील पर्यटन हंगामावर निश्चित होणार असून उपासमारीचे संकट ओढावणार आहे.