शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

मीरा भाईंदर महानगरपालिकेची केंद्र व राज्य सरकार सोबत देखील फसवाफसवी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 7:51 PM

Mira Bhayander News : भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर आधीच मोठी वाहन कोंडी होत असताना तेथे तब्बल ८ कोटीचे सुशोभीकरणाच्या कामाचा अट्टहास मीरा भाईंदर महापालिकेने चालविल्याने येथील वाहतूक समस्या गंभीर बनणार आहे .

वाहतुकीची कोंडी होत असताना ८ कोटीचे सुशोभीकरण प्रकरण 

 मीरारोड - भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर आधीच मोठी वाहन कोंडी होत असताना तेथे तब्बल ८ कोटीचे सुशोभीकरणाच्या कामाचा अट्टहास मीरा भाईंदर महापालिकेने चालविल्याने येथील वाहतूक समस्या गंभीर बनणार आहे . पालिकेने  कामाचा खर्च आधी २ कोटी असल्याचे शासनाला सांगत जागेची मालकी पालिकेची असल्याचे लेखी कळवले होते .  तर केंद्र सरकारच्या मीठ विभागाला जागेचा मोबदला दिलेला नसताना देखील मोबदला दिल्याची खोटी टिप्पणी पालिकेने बनवल्याचे उघड झाले आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेचा घोटाळेबाज कारभार आणि करदात्या नागरिकांच्या घामाच्या पैशांची मनमानी उधळपट्टीचा भाईंदर पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक बाहेरील सुशोभीकरण हा आणखी एक प्रकार सुरु आहे . कोरोनाच्या संक्रमणा मुळे आर्थिक उत्पन्न घटले असताना दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची अनावश्यक कामे टेंडर टक्केवारीसाठी रेटली जात असल्याचे आरोप होत आहेत . 

 २९ जून २०१७ रोजी महापालिकेने नगरविकास विभागाला पाठवलेल्या प्रस्तावात भाईंदर पश्चिमेच्या सुशोभीकरण कामासाठी २ कोटी तर पूर्वेच्या कामासाठी १ कोटी अंदाजित खर्च म्हटले होते . तसेच सदर जागा पालिकेच्या मालकीची नसताना देखील चक्क पालिका मालकीची जागा असल्याचे लिहले होते . 

२ कोटी भाईंदर पूर्व आणि १ कोटी भाईंदर पश्चिम ह्या खर्चास शासना कडून मंजुरी दिली . परंतु  फेब्रुवारी २०१८ च्या महासभेत मात्र २ कोटीचे काम तब्बल  ८ कोटी ७५ हजार रुपयांचे आणि १ कोटीचे  काम तब्बल ५ कोटी वर नेण्यात आले. महासभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने सुधारित अंदाजपत्रकातील तरतुदीस आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली . 

पूर्व व पश्चिम सुशोभीकरणाच्या कामाचा खर्च तब्बल १३ कोटींचा वाढवण्यात आल्याने यात मोठा गैरप्रकार झाल्याचे आरोप होत आहेत . तर शासन केवळ ३ कोटी देणार व उर्वरित १० कोटी ७५ हजारचा खर्च पालिका करणार ह्या प्रस्तावा वर मुख्यलेखापरीक्षक ह्यांनी ११ जुलै २०१७ च्या शासन आदेश नुसार १०० टक्के अनुदानातून खर्च पडणार असल्याने शासनाची जास्त खर्चास मान्यता घेऊन निविदा काढावी असा शेरा मारला . तरी देखील बांधकाम विभागाने निविदा काढली . सदर कामाची ६ महिन्यांची मुदत मार्च मध्येच संपून गेली  असून काम अजूनही रखडलेले आहे . 

वास्तविक २०१७ साली पालिकेनेच भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर रस्ता रुंदीकरण म्हणून येथील जुनी बांधकामे तसेच मीठ विभागाचे बांधकाम नियमबाह्यपणे तोडले होते . मीठ विभागाने कार्यकारी अभियंता दीपक खांबित सह पालिका अंधकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला . पण रस्ता रुंदीकरण नावाखाली आता चक्क सुशोभीकरणाचे अवाढव्य बांधकाम पालिकेने चालवले आहे . 

त्यातच गुन्हा दाखल असताना सुद्धा पालिकेने मीठ विभागाच्या जागेत बळजबरी सुशोभीकरणाचे काम चालवले . मीठ उपअधीक्षक ह्यांनी जानेवारी पासून आयुक्तांना २ पत्र देऊन सदर काम बंद करण्यास सांगितले . परंतु काम बंद करणे तर सोडाच बांधकाम विभागाने चक्क टिपणी मध्ये मीठ विभागाला जागेचा मोबदला दिल्याचे तद्दन खोटे नमूद केले . मीठ उपअधीक्षक ह्यांनी पुन्हा आयुक्तांना पत्र देतानाच पालिकेने मोबदला दिल्याचे म्हणणे खोटे असल्याचे  स्पष्ट सांगितले .

भाईंदर स्थानक बाहेर पश्चिम व पूर्वेस सार्वजनिक उपक्रमाच्या बससेवा , खाजगी बस , रिक्षा सह खाजगी वाहनांची मोठी वर्दळ असते . ह्या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते आणि नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने ये जा करतात . त्यातच सुशोभीकरणाच्या काम मुळे येथील रस्ते व परिसर अरुंद होऊन लोकांची मोठी गरसोय होणार असून वाहतूक कोंडी आणखी भयंकर होणार आहे . महत्वाचे म्हणजे पालिकेने स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी सुद्धा घेतलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर