शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

उल्हासनगर महावितरण कार्यालयावर मनसेचा मोर्चा; भारनियमन, डिपॉझिटबिल रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 7:54 PM

उल्हासनगरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिक उकाड्याने हैराण झाले. हे कमी म्हणून कीं काय नियमित बिला सोबत डिपॉझिट बीले नागरिकांना आल्याने, त्यांच्यात एकच असंतोष निर्माण झाला.

सदानंद नाईक -

उल्हासनगर : शहरात चाललेला विजेचा लपंडाव व आलेल्या डिपॉझिट बिलाच्या निषेधार्थ मनसेने साईबाबा येथील वीज मंडळ कार्यालयावर मनसेने शुक्रवारी दुपारी मोर्चा काढला. कार्यकारी अभियंता नितीन काळे यांना निवेदन देऊन डिपॉझिट बिल रद्द करण्याची मागणी शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली. 

उल्हासनगरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिक उकाड्याने हैराण झाले. हे कमी म्हणून कीं काय नियमित बिला सोबत डिपॉझिट बीले नागरिकांना आल्याने, त्यांच्यात एकच असंतोष निर्माण झाला. वीज भारनियमन व डिपॉसिट बिल रद्द करण्यासाठी मनसेने कॅम्प नं-३ साईबाबा मंदिर येथील महावितरण कार्यालयावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला होता. मोर्चा गेटवर आल्यावर मनसे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी वाढीव बिलाची होळी केली. विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन काळे याना मनसे शिष्टमंडळाने निवेदन देऊन भारनियमन व डिपॉझिट बिले रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वीज भारनियमन बंद झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता काळे यांनी देऊन डिपॉसिट बिला बाबत माहिती घेणार असल्याचे सांगितले.

पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनीच्या आड येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्यात येत असल्याने, वीज जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मनसेच्या मोर्चाचे नेतृत्व शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केले. असून मनसेचे सचिन कदम, संजय घुगे, प्रदीप गोडसे, मैनूद्दीन शेख, सचिन बॅंडके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आदीजन सहभागी झाले. विधुत मंडळ कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डिपॉझिट बिले रद्द झाले नाही तर मनसे पुन्हा आंदोलन करेल. असा इशारा शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMNSमनसेagitationआंदोलन