शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

मुख्यमंत्रीसाहेब, 'या' लोकांना आवरा आता; मनसेने लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:55 IST

जर एखादा नगरसेवक अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल तर त्याला एकटे पाडून कोंडीत पकडायचे हे आता नेहमीचेच झाले आहे,

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली शहरात अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिवसेंदिवस हे गंभीर होत चाललं आहे. सोमवारच्या कडोंमपा भाजपा उपमहापौरांनी महासभेत दिलेला राजीनामा नाट्यावरून दिसून येते की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे असा आरोप मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केला आहे. 

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, काही नगरसेवकांच्या आशिर्वादानेच शहरातील महापालिकेच्या गार्डन,शाळा या सारख्या राखीव भूखंडावर बिनदिक्कत अनधिकृत बांधकामांचे पेव गावगुंडाकरवी सुरू आहे, करोडोंचा शासकीय महसूल बुडवून हे काम सुरू आहे, महापालिकेचे ९० टक्के अधिकारी या भ्रष्टाचारात अखंड बुडाल्याचे दिसून येतं. ह प्रभाग अधिकारी कंखारे यांची उचबांगडी व संजय घरत यांची लाच घेताना लाच लुचपत खात्याकडून झालेली धरपकड ही ताजी उदाहरणं समोर आली आहेत. 

त्याचसोबत  कहर म्हणजे अनधिकृत बांधकामांची यादी देवून सुध्दा लाख लाख रूपये लाच देऊन बिनदिक्कत अशा बांधकामांची दस्त नोंदणी (रजिस्ट्रेशन) ही सरकारी नोंदणी कार्यालयातून होत आहे, हे म्हणजे भ्रष्टाचाराचा कळसच म्हणावा लागेल.परंतु अशा महत्त्वाच्या विषयावर व महापालिकेचा करोडोंचा महसूल बुडवणाऱ्यांविरोधात जर निवडून दिलेले नगरसेवक व शिवसेनेच्या महापौर दुर्लक्ष करत असतील तर ते अनधिकृत बांधकामांना आणि भ्रष्टाचाराला पाठिंबाच देत आहेत हे स्पष्ट होते असं त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

तसेच जर एखादा नगरसेवक अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल तर त्याला एकटे पाडून कोंडीत पकडायचे हे आता नेहमीचेच झाले आहे, पण ह्या सर्व घडामोंडींमुळे एक मात्र नक्की की शहराचे मात्र वाट्टोळे लागत आहे, नागरी सोयी-सुविधांचाही बट्टयाबोळ लागत आहे, विकास कामे करायला महसूल उत्त्पन्नच नाही, शहराच्या मोकळ्या जागा दादागिरीने गिळंकृत होत आहेत. हे सर्व सत्य आहे हे जर बघायचे असेल तर डोंबिवलीच्या गोग्रासवाडी गेटवर तर त्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची नांवासकट यादी असलेले एक भले मोठे होर्डींग गेले अनेक दिवस लागले आहे पण महापालिकेला अशी बांधकामे मात्र दिसत नाहीत हे आश्चर्य नसून भ्रष्टाचार बोकाळल्याचे उत्तम उदाहरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाची सत्ता असणाऱ्या महापालिकेच लक्ष घालून अधोगतीकडे चाललेल्या आमच्या शहराला प्रगतीच्या, विकासाच्या दिशेने घेऊन जातील ही अपेक्षा आहे असं राजेश कदम यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका