शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वतंत्र नगरपालिकेसाठी मनसेही आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:19 IST

२७ गावांचा मुद्दा :...तर आमचे नगरसेवकही राजीनामा देतील, राजू पाटील यांचे पत्र

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चाने गुरुवारी आक्रमक पवित्रा घेत स्वतंत्र नगरपालिकेच्या कार्यवाहीत खोडा घालणाऱ्यांना आंदोलनाद्वारे समज दिली. दरम्यान, या आंदोलनाला मनसेचे नेते राजू पाटील यांनी पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला.गावांच्या भल्यासाठी संघर्ष समितीच्या पाठिंब्यावर व भाजपा तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवल्यास मनसेचे दोन्ही नगरसेवक त्यांच्या पदाचा राजीनामा देतील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली आहे.बेताल वक्तव्य करून खोडा घालण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा घरावर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा गुरुवारी युवा मोर्चाने दिला. दरम्यान, मनसे नेहमीच संघर्ष समिती व युवा मोर्चा यांच्यासोबत आहे, असे पत्र पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना पाठवले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ आॅगस्टची सकाळ २७ गावांतील नागरिकांची इच्छापूर्ती करणारी असेल, असे भाकीत केले होते. सरकारद्वारे आश्वासने नेहमीच दिली जातात. परंतु, दुर्दैवाने अंमलबजावणी मात्र केली जात नाही. मुख्यमंत्र्यांनी हे तशाच प्रकारचे आश्वासन तर दिले नाही ना, याबद्दल पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.१५ आॅगस्टपूर्वी अंमलबजावणी व्हावीमुख्यमंत्र्यांनी २७ गावांना स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा देऊन आम्हाला ती १५ आॅगस्टपर्यंत मिळवून द्यावी. पालिकेला कोणी विरोध करत असेल, तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, याचाही विचार झाला पाहिजे, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण