शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"सत्ता परिवर्तनापासून हिम्मत वाढलीय, पैसे खाल्ले नसते तर..."; मुंब्र्यातील घटनेवरुन मनसे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:44 IST

मुंब्र्यात मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्यावरुन मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले आहेत.

Avinash Jadhav: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुंब्य्रात फळविक्रेते आणि मराठी तरुण यांच्यात मराठी बोलण्यावरुन झालेल्या वादाने स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. मराठी बोलण्यावरुन झालेल्या वादानंतर जमावाने मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली आहे. या सगळ्या प्रकारावरुन मनसे आक्रमक झाली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाण करणाऱ्यांना इशारा दिला आहे. यासोबत अविनाश जाधव यांनी आता भोगा कर्माची फळे असंही म्हटलं आहे.

मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याशी मराठीत बोलण्याची मागणी केल्याने हा प्रकार घडला. ही मागणी विक्रेते आणि तरुण यांच्यात वादाचे कारण ठरली. वादावादीदरम्यान हे प्रकरण चांगलेच तापले आणि उपस्थित जमावाने हस्तक्षेप केला. त्यानंतर या मराठी तरुणाला मुंब्रा पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथे त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. यादरम्यान जमावाने तरुणाला धमकावत माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल देखील करण्यात आला. या प्रकरणावरुन नव्या वादाला तोंड फुटले. मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागतीये तेही महाराष्ट्रात! हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार, आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याच साठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते… आता भोगा कर्माची फळ…’ असं अविनाश जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

"मराठी माणसाच्या बाबतीत आता अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्या आहेत. या लोकांची इतकी हिंमत होतेच कशी की हे व्हिडिओ रेकॉर्ड करून मराठी बोलणार नाही असं सांगतात आणि तो व्हिडिओ व्हायरल करतात. जर असेच घडत राहिलं तर मराठी माणसांचं अस्तित्व विकोपाला येईल. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये हिम्मत वाढली आहे. भविष्यात मराठी माणसांवरील हल्ले वाढतील कारण यांच्या हिमती वाढायला लागल्या आहेत. यांना जर आत्ताच ठेचले नाही तर भविष्यात मराठी माणसाला चौका चौकात मारले जाईल. त्यामुळे माझी मराठी माणसांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र या," असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं.

"मतदानाच्या दिवशी मराठी माणसाने पैसे खाल्ले नसते आणि मनसे सोबत उभे राहिले असते तर आज यांची हिम्मत झाली नसती. हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो. मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे. आम्ही त्यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहू," असंही अविनाश जाधव म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राmarathiमराठीPoliceपोलिस