शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

धोकादायक इमारती बाबत उल्हासनगर महापालिका आयुक्तांना मनसेचे निवेदन

By सदानंद नाईक | Published: September 23, 2022 7:03 PM

मानस पार्क इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारती बाबत निवेदन दिले.

उल्हासनगर: मानस पार्क इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारती बाबत निवेदन दिले. शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करूनही परिपत्रक प्रसिद्ध का केले नाही. याबाबत जाब विचारला. उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून गुरूवारी मानस इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. एका महिन्यात तीन इमारतीचे स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून शासन किती बळी गेल्या नंतर धोकादायक इमारती बाबत परिपत्रक काढणार असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.

 मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी दुपारी १२ वाजता भेट घेऊन अनेक प्रश्नांचा भडीमार करून निवेदन दिले आहे. शहरात सातत्याने कोसळणाऱ्या इमारतीच्या दुर्घटनेत जाणारे नागरिकांचे बळी हे कधी थांबणार, राज्य शासन धोकादायक इमारतींबाबत कधी निर्णय घेणार, धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी कमेटी स्थापन करून आज जवळपास वर्ष होत आले आहे, मात्र निर्णय कधी, विधानसभेतील मुख्यमंत्री यांच्या घोषणेला महिना उलटला तरी आदेश नाही आदी प्रश्न मनसे शिष्टमंडळाकडून करण्यात आले.

शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लावल्या जाणारी दंडाची रक्कम ही सन २००६ च्या रेडिरेकणरच्या ५० टक्के आकारण्यात यावी. असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या इमारती बाबत योग्य निर्णय घेण्याचे मतही यावेळी अनेकांनी व्यक्त केले. आयुक्त अजीज शेख यांनी धोकादायक इमारती बाबत विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून महापालिका लवकरच धोकादायक इमारतींवर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा सचिव संजय घुगे, मैन्नुद्दीन शेख यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरMNSमनसे