शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
3
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
4
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
5
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
6
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
7
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
8
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
9
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
10
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
11
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले
12
हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा
13
बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....
14
भारताने मालिका आधीच जिंकली; आज ३ मोठे बदल होण्याची शक्यता, अशी असेल Playing XI
15
Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट
16
PAK vs ENG : "पाकिस्तानला WTC मधून काढून टाका, गोंधळ लवकर थांबवा", दारुण पराभवानंतर अख्तर संतापला
17
कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ!
18
उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार
19
३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय?
20
Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

मोदी सरकार सुरुवातीपासून अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:39 AM

भार्इंदर : मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात एकही यशस्वी काम केलेले नाही. ते सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच अपयशी ठरल्याचा ...

भार्इंदर : मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात एकही यशस्वी काम केलेले नाही. ते सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच अपयशी ठरल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव बी. एम. संदीपकुमार यांनी केला आहे. ते भार्इंदर येथे आले असता त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी महाराष्ट प्रदेश काँग्रेसचे महासचिव राजेश शर्मा, सहप्रभारी मेहुल व्होरा, माजी आमदार मुझफ्फर हुसेन उपस्थित होते. मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवत संदीपकुमार यांनी मोदींनी केवळ ‘मन की बात’ मध्येच नागरिकांना गुरफटून ठेवल्याचा आरोप करत त्यांनी अद्याप एकही ‘काम की बात’ केली नसल्याचा टोला लगावला. आता या सरकारचे काही महिनेच उरले असताना आतातरी त्यांनी ‘काम की बात’ करावी, जेणेकरून त्याचा फायदा देशासह नागरिकांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदींनी ‘मन की बात’ चे व्रत सोडून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीची उलाढाल चार वर्षांतच कशी काय वाढली, मर्जीतल्या बड्या उद्योगपतींसाठी कमाल जमीन धारणा कायदा का रद्द केला, महागाई कशी वाढली यावर भाष्य करण्याचे आव्हान त्यांनी दिले.

काँग्रेसला येत्या निवडणुकीत जोमाने उतरायचे असल्याने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणीची जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. या मोहिमेद्वारे केंद्रातील मोदीप्रणित सरकारसह भाजपायुक्त राज्य सरकारच्या अपयशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे. पक्षबांधणीसाठी केंद्रस्तरावर काम केले जाणार असून प्रत्येक केंद्रासाठी १० कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यातील प्रत्येकावर २५ घरांच्या संपर्काची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर